“छत्रपती संभाजी महाराजांवर अन्याय केला, पण…”, ‘छावा’ पाहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिली?

मुंबई – १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेला ‘छावा’ चित्रपट, जो छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेचे दर्शन घडवतो, यानंतर सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. या चित्रपटाचे शो अनेक ठिकाणी हाऊसफुल राहिले असून प्रेक्षकांचे भावनिक प्रतिसादही उमटले. बॉलीवूडचे अभिनेता विकी कौशल मुख्य भूमिकेत आणि दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत दिसत असलेल्या ‘छावा’ चित्रपटाने हीट चित्रपटांचे अनेक रेकॉर्ड मोडले आहेत.

चित्रपटाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, कलाकारांची उत्कृष्ठ कामगिरी आणि भव्य सेटसाठी सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. दरम्यान, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधिमंडळ सदस्य व मंत्र्यांसाठी मुंबईत ‘छावा’ चित्रपटाचे खास आयोजन केले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील चित्रपटाचा अनुभव घेतला.
“छत्रपती संभाजी महाराज फक्त वीर नव्हते तर त्यांचे शौर्य, वीरता आणि विद्वत्ता अतुलनीय होती. त्यांना एकूण ११ भाषा येत होत्या. ते संस्कृत पंडित, कवी आणि लेखक होते. त्यांच्या संपूर्ण चरित्रावर इतिहासकारांनी अनेकदा अन्याय केला आहे. खरं तर देशभरात त्यांचे महत्त्व ओळखले पाहिजे होते, परंतु ते दुर्लक्षित राहिले. ‘छावा’ या चित्रपटाद्वारे संभाजी महाराजांचे खरी ओळख संपूर्ण देशात पोहोचली आहे. त्यामुळे या संपूर्ण टीमचे मी मनापासून अभिनंदन करतो.” “सर्वात महत्वाचे म्हणजे या चित्रपटाने ऐतिहासिक तत्वांना अनुकंपेने सादर केले आहे. कुठल्याही स्वरूपात इतिहासाशी प्रातरणा न करता त्यातील तत्व कायम ठेवून ते चित्रपटात परिवर्तित करण्यात आले आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आमच्यासमोर पुन्हा जीवंत करण्यात या चित्रपटाने महत्वपूर्ण काम केले आहे. खरोखरच, ‘छावा’ चित्रपट अतिशय सुंदर बनवण्यात आला आहे.”

कार्यक्रमादरम्यान विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन यांसह इतर नेते उपस्थित होते.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *