भारताची ऐतिहासिक अंतराळ भरारी: ४१ वर्षांनंतर एका भारतीयाचे पुन्हा अंतराळात पदार्पण

नवी दिल्ली: भारतासाठी एक ऐतिहासिक क्षण! ऑक्झिऑम-४ (Axiom-4) मोहिमेअंतर्गत भारतीय हवाई दलाचे पायलट आणि ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी बुधवारी (वेळ: दुपारी १२ वाजून १ मिनिट) स्पेसएक्सच्या फाल्कन-९ रॉकेटने (Falcon-9 Rocket) अवकाशात झेप घेतली. फ्लोरिडामधील केनेडी अंतराळ केंद्रावरून (Kennedy Space Center) ड्रॅगन अंतराळयानातून (Dragon Spacecraft) त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे (International Space Station – ISS) प्रस्थान करून इतिहास रचला आहे.या मोहिमेमुळे ४१ वर्षांनंतर पुन्हा एकदा मानवासहित अंतराळात भारतीयाने पाऊल ठेवले आहे. याआधी १९८४ साली राकेश शर्मा यांनी रशियन यानातून अंतराळ प्रवास केला होता. त्यांच्या नंतर शुभांशू शुक्ला हे अंतराळात जाणारे दुसरे भारतीय ठरले आहेत.

अंतराळातील विलक्षण अनुभव

अंतराळातून देशातील नागरिकांना संबोधित करताना शुभांशू शुक्ला म्हणाले, “नमस्कार, माझ्या प्रिय देशवासियांनो, आपण ४१ वर्षांनंतर पुन्हा अंतराळात पोहोचलो आहोत. हा प्रवास एक विलक्षण अनुभव आहे. सध्या आम्ही प्रति सेकंद ७.५ किलोमीटर वेगाने पृथ्वीभोवती फिरत आहोत.” त्यांच्या अंतराळवीरांच्या पोशाखावर भारतीय तिरंगा ध्वज कोरलेला आहे, जो त्यांना सतत आठवण करून देत आहे की ते तमाम भारतीयांपैकीच एक आहेत.

१४ दिवसांची अंतराळ सफर आणि ५० शास्त्रीय प्रयोग

शुभांशू शुक्ला आणि त्यांच्यासोबत असलेले तीन अन्य अंतराळवीर १४ दिवसांच्या या अंतराळ सफरीवर आहेत. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर वास्तव्य करताना ते एकूण ५० शास्त्रीय प्रयोग करणार आहेत. या प्रयोगांमुळे मानवी शरीरावर अंतराळातील वातावरणाचा होणारा परिणाम आणि इतर अनेक वैज्ञानिक बाबींचा अभ्यास करणे शक्य होणार आहे.
खाद्यसंस्कृतीची अंतराळात ओळख या अंतराळवीरांनी आपल्यासोबत भारतीय खाद्यसंस्कृतीचे प्रतीक असलेले काही पदार्थही नेले आहेत. शुभांशू शुक्ला यांनी भारतीय करी, भात आणि आंबा सरबत सोबत घेतले आहे. यामुळे भारताची संस्कृती अंतराळातही पोहोचली आहे.

लखनऊमध्ये जल्लोष

शुभांशू शुक्ला यांच्या यशाचा जल्लोष त्यांच्या मूळ गावी लखनऊमध्येही पाहायला मिळाला. लखनऊमधील त्यांच्या ‘सिटी मॉन्टेसरी स्कूल’मध्ये (City Montessori School) ‘यानिसितविशेष कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला होता, जिथे पालक आणि विद्यार्थ्यांनी या अंतराळ सफरीचे थेट प्रक्षेपण पाहिले. या मोहिमेमुळे भारताच्या अंतराळ क्षेत्रातील प्रगतीला आणखी गती मिळाली असून, भविष्यात अशा अनेक मोहिमांची अपेक्षा आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *