मुंबईत १५ दिवसांसाठी पाचहून अधिक लोकांच्या जमावास मनाई; शहराच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय

मुंबई पोलिसांनी शहरात कडक बंदोबस्त ठेवत पुढील १५ दिवस पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव केला आहे. ९ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून ते २३ जानेवारीपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे.
        ‘द हिंदू’च्या अहवालानुसार, मुंबईच्या सुरक्षेच्या कारणास्तव हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शांतता बिघडवण्याचा कोणताही प्रयत्न होऊ नये, यासाठी महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार प्रतिबंधात्मक आदेश काढण्यात आला आहे.
पोलिसांच्या आदेशानुसार, पाच किंवा त्याहून अधिक लोकांनी बेकायदेशीर जमाव करणे मनाई आहे. मात्र, विवाह समारंभ, अंत्यसंस्कार, सहकारी संस्था, सामाजिक संघटना, कंपन्यांचे कार्यक्रम तसेच सरकारी उपक्रम यांना यामध्ये सूट देण्यात आली आहे. राजकीय वातावरण आणि इतर कारणांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिसांच्या परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचे आंदोलन किंवा निदर्शने करता येणार नाहीत.
२६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा होणार असल्याने शहरात मोठ्या प्रमाणावर पाहुण्यांचे आगमन होण्याची शक्यता आहे. परदेशी पाहुण्यांचे मुंबईत आगमन लक्षात घेऊन शहराच्या सुरक्षेची जबाबदारी अधिक बळकट करण्यात आली आहे. पोलिसांनी नागरिकांना या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *