Author: Mustan Mirza
-

जीएसटी सुधारणा : विरोधी पक्षशासित राज्यांकडून भरपाईची मागणी
•
नवी दिल्ली : केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या जीएसटी (वस्तू व सेवा कर) सुधारणांमुळे राज्यांच्या महसुलात मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अंदाजे १.५ लाख कोटी ते २ लाख कोटी रुपयांचा फटका बसू शकतो, असे सांगत विरोधी पक्षांच्या सत्ता असलेल्या आठ राज्यांनी केंद्राकडे महसूल भरपाईची मागणी केली आहे. हिमाचल…
-

मराठा आंदोलनामुळे मुंबई ठप्प; प्रवासी अडचणीत, पोलिसांची दमछाक
•
मुंबईत मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळपासून वाहतूक कोंडीची तीव्र समस्या निर्माण झाली. आझाद मैदानाच्या दिशेने निघालेल्या आंदोलनकऱ्यांनी पूर्व दुतर्फा महामार्ग, ईस्टर्न फ्रीवे आणि विविध मुख्य रस्त्यांवर वाहनांची गर्दी केली. त्यामुळे मुंबईकरांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले. शिवडीपासून आझाद मैदानाकडे जाणाऱ्या मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या. परिणामी रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांना…
-

महाराष्ट्रात ३४ हजार कोटींची गुंतवणूक; ३३ हजार रोजगारनिर्मितीची संधी
•
मुंबई : महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या संधींना नवा वेग मिळत असून तब्बल ३४ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी १७ महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाले आहेत. या करारामुळे राज्यात तब्बल ३३ हजार नवीन रोजगार उपलब्ध होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत हे करार पार पडले. या गुंतवणुकीत इलेक्ट्रॉनिक्स, पोलाद, सौर…
-

राज्यात एका वर्षात तब्बल ५१ हजार ८८८ अनाथ-निराधार बालकांची भर
•
महाराष्ट्रात अनाथ व निराधार मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे. राज्य शासनाच्या महिला व बालकायदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केवळ एका वर्षात तब्बल ५१ हजार ८८८ मुलांची वाढ झाली असून, सध्या १ लाख ४५ हजार ९३ बालकांचे संगोपन शासनामार्फत केले जात आहे. या मुलांच्या संगोपनासाठी राज्य सरकारतर्फे…
-

मुंबई उच्च न्यायालयात १४ वकिलांची अतिरिक्त न्यायाधीशपदी नियुक्ती
•
नवी दिल्ली : मुंबई उच्च न्यायालयात तब्बल १४ वकिलांची अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय विधी मंत्रालयाने बुधवारी याबाबतची माहिती दिली. या नियुक्त्यांमुळे न्यायालयातील प्रलंबित खटल्यांच्या निकाली गती मिळण्यास मदत होणार आहे. नियुक्त वकिलांमध्ये सिद्धेश्वर सुंदरराव ठोंबरे, महेरोज अशरफ खान पठाण, रजनीसिंह राजा भोसले, संदेश दादासाहेब पाटील, श्रीराम…
-

शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मंजुरी
•
मुंबई : नागपूर ते गोवा जोडणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा ते सांगली या टप्प्याला राज्य शासनाने अखेर मान्यता दिली आहे. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला वेग मिळणार असून, पुढील टप्प्यांच्या अधिसूचना देखील लवकरच प्रसिद्ध होणार आहेत. याआधी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, कागल, करवीर, हातकणंगले, गडहिंग्लज, भुदरगड आणि आजरा तालुक्यांमधून जाणाऱ्या मार्गाची अधिसूचना…
-

नांदेडमध्ये ऑनर किलिंग; गावभर धिंड काढल्यानंतर प्रेयसी-प्रियकराची हत्या
•
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील गोकळगाव येथे घडलेल्या ऑनर किलिंगच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. गावात विवाहित तरुणीला भेटण्यासाठी आलेल्या प्रियकराला पकडून, त्याच्यासह तरुणीची गावभर दोरीने हात बांधून धिंड काढण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. ही घटना २७ ऑगस्ट रोजी…
-

फक्त १२ वर्षांपूर्वी बांधलेली इमारत कोसळून विरारमध्ये १७ जणांचा बळी
•
विरार : गणेशोत्सवाच्या उत्साहात विरारमध्ये भीषण दुर्घटना घडली. विरार पूर्वेतील विजयनगर परिसरातील रमाईबाई अपार्टमेंटचा काही भाग मंगळवारी मध्यरात्री पावसाच्या सुमारास कोसळला. या घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला असून ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी एनडीआरएफ, महापालिका आणि अग्निशमन दलाचे जवान गेले ४० तास अथक प्रयत्न करत…
-

महिला रोजगारात सहा वर्षांत दुपटीने वाढ
•
मुंबई : भारतात महिलांच्या रोजगाराचे प्रमाण मागील सहा वर्षांत लक्षणीयरीत्या वाढले असून यात दुपटीने वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. २०१७-१८ मध्ये केवळ २२% असलेला महिला कार्यबलातील सहभाग २०२३-२४ मध्ये वाढून ४०.३% वर पोहोचला आहे. पिरिऑडिक लेबर फोर्स सर्व्हेच्या ताज्या अहवालातून हा बदल स्पष्ट झाला आहे. या कालावधीत महिलांच्या बेरोजगारी दरातही…
-

ताटातील पनीर खरं आहे ना? मुंबईत बनावट ‘चीज अॅनालॉग’ची विक्री; ७५० किलो माल जप्त
•
मुंबई : तुमच्या ताटातील भाजीतील पनीर खरी आहे की बनावट, याची खात्री करणे आता गरजेचे ठरले आहे. गणेशोत्सव आणि सणासुदीच्या काळात मुंबईत नफेखोरांकडून मोठ्या प्रमाणात पनीरऐवजी ‘चीज अॅनालॉग’ नावाचा बनावट पदार्थ विक्रीसाठी आणला जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत तब्बल ७५० किलो…
