Author: Mustan Mirza

  • कबुतरांना दाणे घालण्यामुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांवर मानवी हक्क आयोगाची गंभीर दखल

    कबुतरांना दाणे घालण्यामुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांवर मानवी हक्क आयोगाची गंभीर दखल

    मुंबई: मुंबईत कबुतरांची वाढती संख्या आणि त्यांना दाणे घालण्याच्या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याला निर्माण होत असलेल्या धोक्याची गंभीर दखल राज्य मानवी हक्क आयोगाने घेतली आहे. या प्रकरणी आयोगाने सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव आणि मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना नोटीस बजावली आहे. आयोगाचे अध्यक्ष न्या. (नि.) अनंत बदर यांनी स्वतःहून या प्रकरणाची दखल…

  • अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षकांना दिलासा: वाढीव टप्पा अनुदानास मंजुरी

    अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षकांना दिलासा: वाढीव टप्पा अनुदानास मंजुरी

    मुंबई: राज्यातील सुमारे ६,५०० अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षकांचे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले ‘शाळा बंद’ आंदोलन अखेर यशस्वी झाले आहे. महाराष्ट्र शासनाने ११ जुलैच्या शासन निर्णयानुसार वाढीव टप्पा अनुदान मंजूर करण्याचा निर्णय घेतल्याने शिक्षकांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे. १८ जुलैपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे शासनाने स्पष्ट केले…

  • मुंबईत व्हायरल इन्फेक्शनचा वाढता प्रादुर्भाव: रुग्णालयांमध्ये गर्दी

    मुंबईत व्हायरल इन्फेक्शनचा वाढता प्रादुर्भाव: रुग्णालयांमध्ये गर्दी

    मुंबई: सध्या मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात व्हायरल इन्फेक्शनने थैमान घातले आहे. सर्दी, ताप, घसा खवखवणे आणि खोकल्याच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून, शहरातील रुग्णालये रुग्णांच्या गर्दीने भरली आहेत. हवामानातील बदल, पावसाळ्याची सुरुवात आणि वाढते प्रदूषण यामुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे. शहरात अनेक ठिकाणी…

  • बेकायदेशीर लाऊडस्पीकरवर कारवाईसाठी सरकारचे प्रयत्न, अवमान याचिका फेटाळली

    बेकायदेशीर लाऊडस्पीकरवर कारवाईसाठी सरकारचे प्रयत्न, अवमान याचिका फेटाळली

    मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाने धार्मिक स्थळांवरील बेकायदेशीर लाऊडस्पीकरच्या वापरासंदर्भात राज्य सरकारने केलेल्या कारवाईवर समाधान व्यक्त केले आहे. सरकारने या संदर्भात प्रामाणिक प्रयत्न केले असल्याने त्यांच्यावर कोणत्याही अवमान कारवाईची आवश्यकता नसल्याचे न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले. यामुळे नवी मुंबईचे रहिवासी संतोष पाचलाग यांनी दाखल केलेली अवमान याचिका फेटाळण्यात आली. पार्श्वभूमी २०१६ मध्ये…

  • महसूल मंत्र्यांकडून ‘तुकडेबंदी’ कायदा रद्द करण्याची घोषणा; लाखो शेतकऱ्यांना दिलासा

    महसूल मंत्र्यांकडून ‘तुकडेबंदी’ कायदा रद्द करण्याची घोषणा; लाखो शेतकऱ्यांना दिलासा

    महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘तुकडेबंदी’ कायदा रद्द करण्याची मोठी घोषणा केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, महाविकास आघाडीनेही या निर्णयाचे स्वागत केले आहे. काय आहे हा निर्णय? चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी 2025 पर्यंत ज्या जमिनींचे तुकडे झाले आहेत आणि ‘तुकडेबंदी’…

  • अहमदाबाद विमान अपघात: प्राथमिक चौकशी अहवाल सादर

    अहमदाबाद विमान अपघात: प्राथमिक चौकशी अहवाल सादर

    नवी दिल्ली: ११ जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या एआय-१७१ विमान दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशी अहवालात अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विमान दुर्घटना अन्वेषण ब्यूरो (AAIB) ने मंगळवारी आपला प्राथमिक अहवाल नागरी हवाई वाहतूक मंत्रालय आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर केला, परंतु अपघातामागील तपशील अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. अहमदाबादच्या…

  • ठाकरे बंधूंच्या एकीकरणाचे संकेत: आदित्य ठाकरे यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

    ठाकरे बंधूंच्या एकीकरणाचे संकेत: आदित्य ठाकरे यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

    मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वपूर्ण घडामोड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्धवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मनसे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) सोबत संभाव्य युतीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र यावेत, अशी कार्यकर्त्यांची प्रबळ इच्छा असून, या इच्छेला मूर्त स्वरूप देण्यासाठी सध्या दोन्ही पक्षांमध्ये…

  • समीर वानखेडेवरील तपास ३ महिन्यांत पूर्ण करणार – सीबीआयची उच्च न्यायालयात माहिती

    समीर वानखेडेवरील तपास ३ महिन्यांत पूर्ण करणार – सीबीआयची उच्च न्यायालयात माहिती

    कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणी समीर वानखेडे यांच्यावरील तपास तीन महिन्यांत पूर्ण करणार, अशी माहिती सीबीआयने मुंबई उच्च न्यायालयाला दिली आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान, न्यायालयाने तपासाला होत असलेल्या विलंबाबद्दल सीबीआयला प्रश्न विचारला होता, “तुमचा तपास आणखी किती काळ सुरू राहणार? १० वर्षे, २० वर्षे की किती काळ हवा?” वानखेडे यांच्यावर काय आरोप…

  • छ. संभाजीनगर येथील अनधिकृत सुधारगृहात ८० मुली; उच्च न्यायालयाकडून दखल

    छ. संभाजीनगर येथील अनधिकृत सुधारगृहात ८० मुली; उच्च न्यायालयाकडून दखल

    छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथील विद्यादीप बालसुधारगृहातील धक्कादायक परिस्थिती आणि ९ मुलींच्या पलायनासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गंभीर दखल घेतली आहे. खंडपीठाने या वृत्ताला ‘सुमोटो’ जनहित याचिका म्हणून दाखल करून घेतले असून, अनधिकृतपणे ८० मुलींना सुधारगृहात ठेवल्याबद्दल आणि त्यांच्यावर होणाऱ्या छळाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ९ मे २०२५…

  • भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीने धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू; गुन्हा दाखल, आरोपी ताब्यात

    भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीने धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू; गुन्हा दाखल, आरोपी ताब्यात

    बीड: अहिल्यानगर-पुणे महामार्गावर पळवे फाट्याजवळ ७ जुलै रोजी रात्री १०:३० वाजता एका भीषण अपघातात नितीन प्रकाश शेळके (वय ३३, रा. जातेगाव फाटा, ता. पारनेर) या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर सुरेश धस याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी ताब्यात…