Author: Mustan Mirza
-
गोदावरीला पूरस्थिती, विष्णुपुरीचे १७ गेट उघडले; नदीने धोक्याची पातळी ओलांडली
•
नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे. विष्णुपुरी प्रकल्प परिसरात वाढलेल्या पाणलोटामुळे रविवारी सकाळी तब्बल १७ गेट उघडण्यात आले असून, ३ लाख ९ हजार १७४ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, नदीकाठच्या अनेक वस्त्यांमध्ये…
-
दक्षिण मुंबई ते बीकेसीपर्यंत भुयारी मार्गाचा विचार; वाहतूककोंडीला दिलासा मिळणार
•
मुंबई : महानगरातील वाढती लोकसंख्या आणि वाढत्या वाहनसंख्येमुळे दिवसेंदिवस तीव्र होत असलेल्या वाहतूककोंडीवर तोडगा म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) एक महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्याची तयारी केली आहे. दक्षिण मुंबईपासून बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील बुलेट ट्रेन स्थानक, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि पुढे पूर्व उपनगरांपर्यंत थेट जोडणारा भुयारी मार्ग उभारण्याचा…
-
मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि पुरस्थितीवरील सविस्तर विश्लेषण अहवाल
•
मुंबईस्थित फॅक्ट टॅन्क “महाराष्ट्र रिसर्च सेंटर”च्या बातमीदार आणि संशोधन सहाय्यक टीमने गेल्या सात दिवसांच्या अथक मेहनतीने मराठवाडय़ातील जल संकटाचा सर्व अंगाने मागोवा घेऊन, एक अहवाल तयार केला आहे. आम्ही तो तयार करतानाच, हा अहवाल कोणी मंत्री किंवा कोणतेही पदाधिकारी यांच्या पुढे मांडण्यापेक्षा, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची कारणमीमांसा करणारा, या नुकसानीची…
-
जागतिक मराठी संमेलन पणजीत – अध्यक्षपदी शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर
•
पणजी (प्रतिनिधी) :मराठी साहित्यविश्वासाठी ऐतिहासिक ठरणारे जागतिक मराठी संमेलन यंदा गोव्याची राजधानी पणजी येथे होणार आहे. जागतिक मराठी अकादमी, गोवा मराठी अकादमी, गोमन्तक साहित्य सेवक मंडळ इन्स्टिट्यूट मिनिझेस ब्रागांझा (आयएमबी) व बिल्वदल परिवार या संस्थांच्या संयुक्त विद्यमान ९ ते ११ जानेवारी २०२६ मध्ये हे संमेलन पार पडणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी…
-
ऑनलाइन गेमिंगच्या आडून १९ कोटींची फसवणूक – रायगड पोलिसांची कारवाई
•
रायगड : ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून तब्बल १९ कोटी रुपयांची मोठी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार रायगडमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी रायगड सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करत देशभरातील विविध बँकांमधील ४४ खात्यांतील रक्कम गोठवली आहे. सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या या फसवणुकीच्या प्रकरणात अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यात सहभागी आरोपींमध्ये…
-
तातडीने मदत; नुकसान अहवाल केंद्राकडे पाठवणार – महसूलमंत्री बावनकुळे
•
नागपूर : राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जाणार असून पंचनामे पूर्ण झाल्यानंतर सामूहिक नुकसान अहवाल केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल, अशी माहिती महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली. राज्य दौऱ्यावर असताना महसूलमंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेऊन…
-
एससी उपवर्गीकरणावर तीन महिन्यांत निर्णय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
•
मुंबई : अनुसूचित जातींच्या (एससी) उपवर्गीकरणाबाबतचा निर्णय महाराष्ट्र सरकार पुढील तीन महिन्यांत घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत केली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा सखोल अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त…
-
‘हिंडेनबर्ग’ने भारतीय उद्योगांच्या स्वप्नांवरच घातला घाला – गौतम अदानी
•
मुंबई : अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी यांनी भागधारकांना लिहिलेल्या पत्राद्वारे हिंडेनबर्ग रिसर्चवर गंभीर आरोप केले आहेत. केवळ अदानी समूहच नव्हे तर संपूर्ण भारतीय उद्योगक्षेत्राचे जागतिक स्वप्न उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न हिंडेनबर्गने केला, असे ते म्हणाले. अदानी यांनी आपल्या पत्रात २४ जानेवारी २०२३ या तारखेचा विशेष उल्लेख केला. या…
-
राज ठाकरेंची मागणी : शेतकऱ्यांना एकरी ३० हजार नुकसानभरपाई द्या
•
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या स्थितीकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. मे महिन्यापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने ग्रामीण महाराष्ट्रात शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी जमीन व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना निष्पक्ष पंचनाम्यांशिवाय थेट…
-
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार
•
मुंबई : राज्यातील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना मंजुरी देताना होणारा कालापव्यय टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील पायाभूत सुविधा उपसमितीने घेतलेले निर्णय आता थेट अंतिम मानले जाणार आहेत. त्यामुळे या प्रकल्पांबाबत वारंवार होणारी पुनरावृत्ती थांबून निर्णय प्रक्रियेला गती मिळणार आहे. यापूर्वी उपसमितीतून मंजूर झालेले प्रस्ताव अंतिम…