Author: mahacentreweb@gmail.com
-

गोगावलेंच्या समर्थकांनी तटकरेंना डिवचले; नॅपकिन वाटून केला वाढदिवस साजरा
•
पनवेल : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी मंत्री भरत गोगावले यांची “नॅपकिन स्टाईल” ची खिल्ली उडवल्यानंतर आता भरत गोगावले यांच्या समर्थकांनी रविवारी त्यांच्या वाढदिवसानिमित्त नॅपकिन वाटले. गेल्या महिन्यात तटकरे यांनी एका पक्षाच्या कार्यक्रमात खांद्यावर टॉवेल घेऊन गोगावले यांच्या वागणुकीची खिल्ली उडवली होती. आता वाढदिवसाच्या कार्यक्रमात शेकडो कार्यकर्त्यांना नॅपकिन वाटून…
-

अजित पवारांनी चुकीची कबुली देताच संजय राऊतांनी राजीनामा मागितला
•
मुंबई : उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेत चूक झाल्याची कबुली दिल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी अजित पवारांचा राजीनामा मागितला आहे. राज्याच्या अर्थ विभागात मोठा घोटाळा झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. अजित पवारांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, ‘अजित पवारांनी राजीनामा द्यावा.…
-

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआदी पडद्यामागे वेगळं काही घडत तर नाही ना?
•
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना ग्रीन सिग्नल दिला आहे. स्थानिक पातळीवरची ताकद दाखवण्यासाठी ही या निवडणुका अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाची निवडणूक असणार आहे ती म्हणजे मुंबई महापालिकेची. भाजप आणि उद्धव सेनेत बीएमसी ताब्यात घेण्यासाठी रस्सीखेच असणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीतील पक्षांनी…
-

बीसीसीआयने IPLच्या फायनलसाठी तिन्ही दलांच्या प्रमुखांना केले आमंत्रित
•
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरला ट्रिब्युट म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय सशस्त्र दलांच्या सर्व प्रमुखांना इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या अंतिम सामन्याला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले आहे. आयपीएल २०२५ चा अंतिम सामना ३ जून रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर तीन प्लेऑफ सामन्यांच्या शेवटी राहिलेल्या शेवटच्या दोन स्थायी संघांमध्ये…
-

आरसीबी ९ वर्षांनी आयपीएलच्या फायनलमध्ये; कर्णधार काय म्हणाला?
•
मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चा कर्णधार रजत पाटीदारने गुरुवारी नऊ वर्षांनी इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर संघाच्या चाहत्यांचे आभार मानले आणि सांगितले की, आता फक्त एक सामना शिल्लक आहे, आपण एकत्र आनंद साजरा करू. क्वालिफायरमध्ये पंजाब किंग्जचा आठ विकेट्सने पराभव करून आरसीबीने चौथ्यांदा आयपीएलच्या अंतिम…
-

गोकुळच्याही चाव्या मुश्रीफांकडे, अध्यक्षपदाची माळ मुलगा नावेदच्या गळ्यात
•
कोल्हापूर : मागील काही दिवसांपासून गोकुळचा अध्यक्ष कोण होणार, यावर चर्चा रंगल्या होत्या. विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर गोकुळचं राजकारण ढवळून निघालं. त्यामुळे अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार? यावर खलबत सुरू होते. अखेर मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नावेद मुश्रीफ यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. असं…
-

केईएम रुग्णालयात पाणी शिरल्याबद्दल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
•
मुंबई: केईएम रुग्णालयात पावसाचे पाणी साचल्याने प्रमुख वैद्यकीय सेवा विस्कळीत झाल्याच्या वृत्तावरून मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी महाराष्ट्र आरोग्य विभाग आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) यांना फटकारले. न्यायालयाने अधिकाऱ्यांना अशा घटना रोखण्यासाठी, विशेषतः पावसाळ्यापूर्वी, त्वरित पावले उचलण्याचे निर्देश दिले. न्यायमूर्ती गौरी गोडसे आणि न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांच्या खंडपीठासमोर वकील मोहित खन्ना यांनी…
-

मंगळुरूमधील काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे, हे आहे कारण
•
मंगळुरू : दक्षिण कन्नडमधील सत्ताधारी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलच्या अनेक मुस्लिम कार्यकर्त्यांनी गुरुवारी सामूहिक राजीनामा दिला. त्यांनी राज्य सरकारवर दुर्लक्ष केल्याचा आणि सूडबुद्धीने होणाऱ्या हत्यांमध्ये समुदायाचे रक्षण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. काही तासांनंतर, सरकारने मंगळुरूसह किनारपट्टीच्या प्रदेशात तणाव कमी करण्यासाठी विशेष सांप्रदायिक हिंसाचार नियंत्रण दल (CVCF) ची घोषणा केली…
-

वाढत्या शहरीकरणामुळे पुण्याच्या कार्बन शोषण क्षमतेत ३४% घट; पुराचा धोकाही वाढला
•
पुणे : गेल्या आठवड्यात सस्टेनेबल फ्युचर्समध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की पुणे शहराच्या कार्बन साठवण क्षमतेत गेल्या दशकात, २०१३ ते २०२४ दरम्यान ३४ टक्क्यांनी घट झाली आहे. संशोधनात या महत्त्वपूर्ण नुकसानाचे श्रेय शहराच्या जलद शहरीकरणाला दिले आहे? ज्यामुळे अनियंत्रित विकासाच्या दीर्घकालीन पर्यावरणीय परिणामांबद्दल चिंता निर्माण झाली…
-

कृषिमंत्री कोकाटे यांचे पुन्हा वादग्रस्त विधान, म्हणाले, ढेकळांचे पंचनामे करायचे का?
•
नाशिक : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि वादग्रस्त वक्तव्य हे एक समीकरण बनले आहे. त्यांनी आणखी वादग्रस्त वक्तव्य केले आहे, ज्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. ते म्हणाले, हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का? असा उलट सवाल त्यांनी शेतकऱ्यांना केला आहे. अवकाळी पावसाने नाशिकमधील कांदा, द्राक्षे…
