Category: News and Updates
-

७.२५ कोटींची २ लाख पुस्तके खरेदी केल्याप्रकरणी युनियन बँक चौकशीच्या भोवऱ्यात
•
युनियन बँक ऑफ इंडियाने माजी मुख्य आर्थिक सल्लागार (सीईए) कृष्णमूर्ती व्ही. सुब्रमण्यम यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या सुमारे २ लाख प्रती खरेदी करण्यासाठी सुमारे ७.२५ कोटी रुपये खर्च केले. इकॉनॉमिक टाईम्सने त्यांच्या एका वृत्तात ही माहिती दिली आहे. हा अहवाल अशा वेळी आला आहे जेव्हा सुब्रमण्यम यांना नियोजित वेळेच्या सहा महिने आधीच…
-

चौंडी : ऐतिहासिक मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले हे 11 महत्वाचे निर्णय
•
चौंडी ( अहिल्यानगर) : राज्य मंत्रिमंडळ बैठक आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्मगाव चौंडी जिल्हा अहिल्यानगर येथे पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही ऐतिहासिक बैठक पार पडली. ज्यामध्ये 11 महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. या बैठकीत…
-

दीड वर्षानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष,चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी
•
सर्वोच्च न्यायालयात दीड वर्षानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह आणि नाव या याचिकेवर सुनावणी होणार आहे. सप्टेंबर २०२३ नंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पहिल्यांदा यादीवर आले आहे. त्यामुळे या प्रकरणावर आता शिवसेना पक्षासबंधी याचिकेवर ७ मे रोजी सुनावणी होणार आहे.तसेच राष्ट्रवादी पक्षाच्या पक्ष आणि चिन्हावर 14 मे रोजी सुनावणी होणार…
-

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 4 महिन्यांच्या आत निवडणूका घ्या; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
•
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. ‘चार महिन्याच्या आत निवडणुका घ्या’ असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. त्यामुळे गेल्या वर्षांपासून रखडलेल्या महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका/नगरपरिषद/नगरपंचायतच्या निवडणुका यावर्षी सप्टेंबर महिन्याच्या आदी होण्याचे चिन्हे आहेत. हा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर…
-

बुद्धधातूंचा बुधवारी लिलाव; या कारणामुळे जगभरातून होतोय विरोध
•
प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय लिलाव कंपनी बुधवारी उत्तर प्रदेशातील पिप्रावा येथे 1890 च्या दशकात सापडलेल्या मौल्यवान रत्नांचा लिलाव करणार आहे. ज्यामध्ये बुद्धधातूंचा समावेश आहे. मात्र, आता पिप्रावा रत्नांच्या विक्रीमुळे नवा वादंग निर्माण झाला असून जागतिक स्तरावरील बौद्ध धर्माशी संबंधित नेत्यांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.गौतम बुद्धांशी संबंधित रत्नांच्या विक्रीवर बौद्ध विद्वानांनी आणि…
-

अबब… शेतकऱ्याच्या बँक खात्यात अचानक आले खरबो रुपये; आकडा वाचून तुमचंही डोकं चक्रावेल
•
उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील शेतकरी अजित सिंह यांच्या बँक खात्यात अचनक खरबो रुपये आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही रक्कम किती आहे हे वाचून शेतकरी काय चांगला सुशिक्षित पण सांगू शकणार नाही. कारण ते आकडे पाहून तुम्हीही चक्रावून जाल. सादाबाद तालुक्यातील नगला दुर्जिया गावातील शेतकऱ्याच्या खात्यात तब्बल १० नील १ खरब…
-

मुंबईकरांना दिलासा; पाणीपुरवठ्यात कपात होणार नाही
•
मुंबई : वाढत्या तापमानामुळे मुंबईत पाणीपुरवठा होणाऱ्या धरणाची पातळी खालावली आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणीपुरवठ्यात कपात होईल का, हा प्रश्न भेडसावत होता. मात्र आता मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. पाणी कपातीची चिंता नाही, कारण मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. त्यामुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्यात कोणतीही कपात होणार नाही, असे बृहन्मुंबई महानगरपालिका…
-

ऐलान ए जंग? युद्धाच्या पार्श्वभूमीवर उद्या देशभरात होणार नागरिकांची ‘मॉक ड्रिल’
•
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या देशात आता तणाव निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने अनेक राज्यांना युद्धसज्जतेसाठी उद्या 7 मे रोजी मॉक ड्रिल म्हणजे युद्धकाळात बचाव कसा करायचा, याचा सराव करण्याचे निर्देश दिले आहे. युद्धासाठी पूर्ण सज्ज व्हा आणि युद्धकाळातील उपायांचा सराव करण्याचे केंद्र सरकारकडून…
-

चौंडीत आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; सभापती राम शिंदेंनी असं केलं नियोजन
•
अहिल्यानगर : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी गावात पार पडणार आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दीवर्षानिमित्त ही बैठक चौंडीत आयोजित करण्यात आली आहे. बहुतांश मंत्री अहिल्या नगर येथील शासकीय विश्रामगृहावर मुक्कामीसाठी पहिलंच आले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसाठी चौंडीत विश्रांती कक्ष, दोन किमीवर वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आली…
-

राज्यावर पाणीटंचाईचं संकट; 2 हजार 997 प्रकल्पातील पाणीसाठा 33 टक्क्यांवर
•
राज्यात पाणीटंचाई भेडसावत आहेत. कारण राज्यातील २ हजार ९९७ प्रकल्पात ३३ टक्के पाणीसाठा उरला आहे. तब्बल ३ हजार १५ गावं, वाड्यांची तहान टँकर्सने भागवली जात आहे. तसेच तापमानामुळे पाणीपातळी आणखी खालावण्याची शक्यता असल्याने पाणीटंचाईचं संकट राज्यात घोंगवत आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढली तशी टँकरची संख्या वाढत आहे. वेगाने वाढणारी टँकरची…
