Category: News and Updates
-

जनरेटिव्ह एआयमध्ये अब्जावधींची गुंतवणूक; पण नफा मात्र शून्य!
•
बॉस्टन : तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर झपाट्याने वाढत आहे. विशेषतः जनरेटिव्ह एआय टूल्स जसे की चॅटजीपीटी आणि कोपायलट यांच्याकडे कंपन्यांनी अब्जावधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मात्र, इतकी प्रचंड गुंतवणूक करूनही या साधनांचा कंपन्यांच्या नफ्यावर थेट परिणाम झालेला नाही, असा धक्कादायक निष्कर्ष मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी)च्या…
-

चार लाख नागरिकांच्या सूचनांवर महाराष्ट्राचे ‘व्हिजन २०४७’; खासगी शाळांना अनुदान आणि बरंच काही
•
मुंबई : विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्य सरकारकडून तयार होत असलेल्या ‘व्हिजन २०४७’ डॉक्युमेंटचा मसुदा सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आला. राज्यातील सात विभागांतील अधिकाऱ्यांनी हा प्रारूप मसुदा सादर केला. या मसुद्यात तब्बल चार लाख नागरिकांच्या सूचनांचा समावेश करण्यात आला आहे.फडणवीस यांनी बैठकीत सांगितले की, २०३०…
-

२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले; छाननीनंतरच मिळणार लाभ
•
मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेतून तब्बल २६ लाख ३४ हजार लाभार्थींचे मानधन तात्पुरते रोखण्यात आले आहे. या बहिणींच्या पात्रतेबाबत शंका उपस्थित झाल्याने सध्या छाननी सुरू आहे. मात्र, इतर २.२९ कोटी लाभार्थी महिलांना योजनेचा लाभ सुरळीत मिळत आहे, असे महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे. महिला व बालविकास मंत्री…
-

‘आपले सरकार’च्या सेवा आता व्हॉट्सअॅपवर
•
मुंबई : राज्य सरकारकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या विविध ऑनलाइन सेवांचा आता व्हॉट्सअॅपवरही लाभ घेता येणार आहे. ‘आपले सरकार’ पोर्टलवरील सर्व सेवा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले. ‘वर्षांव’ नागरिक संपर्क बैठकीत फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिकेच्या एकाच प्रकारच्या नऊ सेवांचे एकत्रीकरण करण्याचे आदेश दिले.…
-

खासदार सुप्रिया सुळे यांच्या मांसाहारावरील विधानावरून वादंग
•
मुंबई : शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मांसाहाराबाबत केलेल्या विधानावरून राज्यात नवीन वादंग पेटला आहे. “मी मांस खाते तर माझ्या पांडुरंगाला चालते” या त्यांच्या विधानावरून भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली असून, वारकरी संप्रदायाची थट्टा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुळे यांनी शनिवारी नाशिक दौऱ्यात माध्यमांशी बोलताना मांसाहाराविषयी…
-

मराठवाड्यासाठी हक्काचे पाणी मागणाऱ्या दोन याचिका फेटाळल्या : एमडब्ल्यूआरआरएचा अन्यायकारक निर्णय
•
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळावे यासाठी २०१९ मध्ये मराठवाडा जनतापरिषद दरवर्षी करीत असलेल्या दोन वेगवेगळ्या याचिका महाराष्ट्र जलसंपत्ती नियम प्राधिकरणाने (एमडब्ल्यूआरआरए) नुकत्याच फेटाळल्या आहेत. हा निर्णय मराठवाड्यासाठी अन्यायकारक असून, याविरुद्ध हायकोर्टात जाण्याचा निर्णय घेतल्याचे जनतापरिषद अध्यक्ष डॉ. शंकरराव नागरे यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारने जनआराखड्यात कमी पावसाच्या प्रदेशासाठी…
-

“४२ लाख नव्या मतदारांमागचं सत्य शोधा”, उद्धव ठाकरे यांचं शिवसैनिकांना आवाहन
•
मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत मोठ्या प्रमाणात गोंधळ होत असल्याचे आरोप होत आहेत. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना जागरूकतेचे आदेश दिले आहेत. “डोळ्यात तेल घालून मतदार तपासा. गेल्या निवडणुकीत सुमारे ४२ लाख मतदार वाढले. त्यात नेमके कोण घुसखोर आहेत, याचा…
-

तीन निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, सरन्यायाधीश गवईंचा हस्तक्षेप
•
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. बी. पारडिवाला यांनी गेल्या महिन्यात दिलेल्या तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत आले असून, सरन्यायाधीश भूषण गवई यांना यात हस्तक्षेप करावा लागला आहे. या प्रकरणांमध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयावर केलेली टीका, भटक्या कुत्र्यांबद्दल काढलेला आदेश आणि हिमाचल प्रदेशातील पर्यावरणीय असंतुलनाचा मुद्दा आहे. १) भटक्या…
-

परिवहन मंत्र्यांच्या मतदारसंघातच एसटी कर्मचाऱ्यांची कुचंबणा
•
मीरा रोड : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी बसची मागणी मोठ्या प्रमाणावर झाली. भाजप व शिंदेसेनेच्या नेत्यांनी दहिसर-जोगेश्वरी परिसरातून एसटी बस आरक्षित केल्या. मात्र, या बसेस उशिरा मिळाल्याने आणि योग्य ठिकाणी सोय न झाल्याने मीरा-भाईंदर पालिकेकडे जागांची मागणी करण्यात आली. पालिकेने जागा दिली असली तरी एसटी अधिकाऱ्यांनी पाहणी न…
-

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर एसआयटीची स्थापना
•
मुंबई : परभणीतील पोलिस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकरणात अखेर विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पोलिस महासंचालकांना आठ दिवसांत एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशानुसार पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी या पथकाची घोषणा केली.या एसआयटीचे अध्यक्ष…
