Category: News and Updates
-

स्वातंत्र्यदिनानिमित्त महाराष्ट्रातील ४१ पोलिसांना सन्मान
•
मुंबई: स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने, महाराष्ट्रातील ४१ पोलिसांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई पोलीस दलाचे सह पोलीस आयुक्त अनिल कुमार, वरिष्ठ सह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, आणि पुण्यातील सहायक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंग गौर यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर झाले आहे. याव्यतिरिक्त, सात पोलिसांना शौर्य पदक, तर ३४ पोलिसांना…
-

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल
•
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. परप्रांतीय लोकांना मारहाण आणि धमकावल्याच्या प्रकरणी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. उत्तर भारतीय विकास सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्ते सुनील शुक्ला यांनी यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात याचिका…
-

आजपासून केंद्र सरकारची खासगी वाहनांसाठी ‘वार्षिक फास्टटॅग पास’ योजना
•
नवी दिल्ली: राष्ट्रीय महामार्गांवर नियमित प्रवास करणाऱ्या खासगी वाहनचालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षाच्या निमित्ताने, केंद्र सरकारने ‘वार्षिक फास्टटॅग पास’ ही एक विशेष योजना सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश खासगी वाहनांचा टोल भरणा अधिक जलद आणि सोयीचा करणे हा आहे. या योजनेनुसार, खासगी वाहनचालकांना आता…
-

बँकेचे चेक आता काही तासांतच होणार क्लिअर; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय
•
आता बँकेतील चेक क्लिअर होण्यासाठी दोन-तीन दिवस थांबण्याची गरज नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चेक क्लिअरिंगची नवीन पद्धत जाहीर केली आहे, ज्यामुळे चेक काही तासांतच क्लिअर होतील
-

वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना ईडीकडून अटक
•
वसई-विरार शहरातील ६० एकर जमिनीवर उभ्या असलेल्या ४९ अनधिकृत इमारतींच्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक केली आहे.
-

कबुतरखान्यांबाबत आरोग्य आणि आस्थेचा विचार करूनच मार्ग काढू: मुख्यमंत्री फडणवीस
•
लोकांचे आरोग्य महत्त्वाचे आहे आणि त्याचे रक्षण होणे आवश्यक आहे. मात्र त्याचबरोबर समाजाच्या आस्थेचाही विषय महत्त्वाचा आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कबुतरखान्यांबाबत दोन्ही गोष्टींचा विचार करूनच मार्ग काढू, असे स्पष्ट केले
-

स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्रातील १६ सरपंच दिल्लीला आमंत्रित, मस्साजोगच्या सरपंच यांनाही खास निमंत्रण
•
दिल्लीतील ७९व्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील ९ महिलांसह एकूण १६ सरपंचांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.
-

मंत्रालयात मंत्र्यांच्या कार्यालयांनी सामान्य नागरिकांसाठीच्या जागांवर केले अतिक्रमन
•
मंत्रालयात मंत्री कार्यालये आणि काही कक्षांनी सामान्य नागरिकांना बसण्यासाठी असलेल्या जागांवर अतिक्रमण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
-

‘आधार’, ‘मतदार ओळखपत्र’ नागरिकत्वाचा पुरावा नाही: सर्वोच्च न्यायालय
•
सर्वोच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निर्णयात म्हटले आहे की, आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र हे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानले जाऊ शकत नाही. मतदार यादीतून नाव वगळण्याचा किंवा समाविष्ट करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडे आहे.
-

माजी मंत्री बच्चू कडू यांना तीन महिन्यांची शिक्षा
•
सात वर्षांपूर्वी एका सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी माजी आमदार बच्चू कडू यांना मुंबई सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे.
