Category: News and Updates
-

माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर अजित पवारांचे निर्विवाद वर्चस्व; विरोधकांचा धुव्वा
•
बारामती : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या आणि बारामती तालुक्यातील प्रतिष्ठेची लढाई म्हणून पाहिली गेलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. अपेक्षेप्रमाणे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निलकंठेश्वर पॅनेलने या निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व मिळवत पुन्हा एकदा कारखान्यावर सत्ता स्थापन केली आहे. केवळ दोन जागा वगळता इतर कोणत्याही…
-

आदिवासी विद्यार्थ्यांच्या भत्त्यात वाढ: राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
•
मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत, शासकीय वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्ता, आहार भत्ता आणि शैक्षणिक साहित्य खरेदी भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांना दुप्पट लाभ मिळणार आहे. किती वाढणार भत्ता? निर्वाह भत्ता (दरमहा): *…
-

बहुचर्चित महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्गासाठी रु. २०,७८७ कोटींची तरतूद मंजूर
•
महाराष्ट्र सरकारने बहुचर्चित महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्गासाठी रु. २०,७८७ कोटींची तरतूद मंजूर केली आहे. या निर्णयामुळे नागपूर ते गोवा हे १८ तासांचे प्रवासाचे अंतर केवळ ८ तासांवर येणार आहे, ज्यामुळे राज्याच्या पूर्वेकडील पवनार (जि. वर्धा) पासून पश्चिमेकडील पत्रादेवी (जि. सिंधुदुर्ग) पर्यंतचा प्रवास सुलभ होईल. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण…
-

मुंबई उच्च न्यायालयासाठी वांद्रे येथे ३० एकर भूखंड आरक्षित
•
मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन संकुलासाठी वांद्रे पूर्वेकडील शासकीय वसाहतीतील ९० एकर जागेपैकी ३०.१६ एकर भूखंड सार्वजनिक बांधकाम विभागाला निःशुल्क हस्तांतरित करण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. यामुळे उच्च न्यायालयाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. उच्च न्यायालयाने हा भूखंड सहा टप्प्यांत हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले होते. त्यापैकी…
-

‘समृद्धी’च्या शेवटच्या टप्प्यात अवघ्या १९ दिवसांतच खड्डे; कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह!
•
मुंबई, कसारा, इगतपुरी: मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) आमने ते इगतपुरी या शेवटच्या ७६ किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे उद्घाटन होऊन अवघे १९ दिवस उलटले नसतानाच, या मार्गावर खड्डे पडल्याचे समोर आले आहे. शहापूरजवळच्या एका ओव्हरपासच्या पुलावर हे खड्डे दिसून आल्याने, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) कामाच्या दर्जावर पुन्हा एकदा तीव्र…
-

मुलीच्या शिक्षणाची चिंता जडल्याने शेतकरी पित्याची आत्महत्या
•
धाराशिव : कर्जाचा डोंगर आणि मुलीच्या उच्च शिक्षणाची चिंता या दुहेरी विवंचनेतून धाराशिव तालुक्यातील डकवाडी येथील ३८ वर्षीय शेतकरी अमोल नवनाथ डक यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळी ७ वाजता कुटुंबीयांच्या निदर्शनास आली. ढोकी पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अमोल डक यांच्यावर…
-

गडकरींचे ‘इंटेलिजेंट सिस्टम’ अपघातांना आळा घालणार
•
नवी दिल्ली: केंद्रीय रस्ते परिवहन आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गांवरील अपघातांची संख्या आणि त्यामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. २०१४ पासून ते या दिशेने प्रयत्नशील असून, आता त्यांनी ‘अडव्हान्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ (ATMS) द्वारे महामार्गांचे अत्याधुनिक डिजिटलीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नियम मोडणाऱ्या…
-

१ जुलैपासून रेल्वे प्रवास महागणार: एसी आणि लांब पल्ल्याच्या प्रवासात वाढ
•
नवी दिल्ली: भारतीय रेल्वेने १ जुलै २०२५ पासून लागू होणारी भाडेवाढ जाहीर केली आहे. या दरवाढीमुळे लांब पल्ल्याचे आणि वातानुकूलित (एसी) डब्यांमधील प्रवास काही प्रमाणात महाग होणार आहे. मात्र, कमी अंतराच्या तसेच उपनगरीय रेल्वे प्रवासाच्या भाड्यात कोणताही बदल होणार नाही, त्यामुळे दैनंदिन प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. भारतीय रेल्वे प्रशासनाने दीर्घकाळ…
-

अ.भा मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार वितरण सोहळा २ जुलै रोजी मुंबईत
•
मुंबई: अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा “बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव” पुरस्कार यंदा ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना तर महाराष्ट्र रिसर्च सेंटरचे महेश म्हात्रे यांना आचार्य अत्रे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. २ जुलै, २०२५ रोजी मुंबई येथे होणाऱ्या या दिमाखदार सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि…
-

माळेगाव साखर कारखाना निवडणूक: शरद पवारांना मोठा धक्का, अजित पवारांचा वरचष्मा
•
माळेगाव, पुणे: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘बळीराजा सहकार बचाव पॅनेल’ला मोठा धक्का बसला असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘निळकंठेश्वर पॅनेल’ने विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील मतमोजणीत शरद पवारांच्या उमेदवाराला अत्यंत कमी मते मिळाल्याने हा धक्का अधिकच स्पष्ट झाला…
