“कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र येणं हा आमचा अंतर्गत प्रश्न; अजित पवार स्पष्टच बोलले

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील अनेक मतभेदाच्या बातम्या झाल्या. राजकीय व्यासपीठावर दोघांनी एकमेकांवर टीका केली. त्यामुळे कौटुंबिक कार्यक्रमात हे दोघे एकत्र येतील का? अशी अनेकदा चर्चा झाली आणि अजित पवार यांचा मुलगा जय पवार याच्या साखरपुड्याला शरद पवार उपस्थित होते. आता यावर अजित पवार यांनी स्पष्ट भाष्य केले आहे. कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र येणं हा पवार कुटुंबाचा अंतर्गत प्रश्न आहे. परिवार म्हणून एकत्र येणं ही महाराष्ट्राची परंपरा असल्याचं अजित पवार म्हणाले. पुण्यातील वसंतदादा इन्स्टिट्युटच्या बैठकीत शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र आले. या संस्थेचे शरद पवार हे संस्थापक असून आपण ट्रस्टी आहोत, त्यामुळे आपल्याला एकत्र यावं लागतं असंही अजित पवार म्हणाले.

महत्त्वाचं म्हणजे ही बैठक झाल्यानंतर वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या काही मोजक्या अधिकाऱ्यांसह काका पुतण्याची वेगळी बैठक पार पडली. साखर संकुलात तब्बल अडीच तास काका पुतणे एकमेकांच्या शेजारी असल्याचं दिसून आलं. एकीकडे ठाकरेंच्या घरात युतीची चाहूल लागल्याची चर्चा असताना पवार काका पुतणे देखील एकत्र येण्याच्या मार्गावर आहेत का याची चर्चा राज्याच्या राजकारणात जोर धरू लागली आहे.

याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, “साखरपुडा कार्यक्रम परिवारातील आहे. बाकीच्यांनी त्यावर काही चर्चा करण्याची गरज नाही. तो पवार कुटुंबियांच्या अंतर्गत प्रश्न आहे. इतर ठिकाणी संस्था म्हणून हजर राहतो. रयत शिक्षण संस्था ही चांगली संस्था आहे. तिथे पण एआय चा कसा वापर करता येईल यावर विचार सुरू आहे. आजची बैठक ही एआय बाबत होती. ज्यातून शेतकऱ्यांचा फायदा होत असेल तर या गोष्टी आहेत त्या केल्या पाहिजेत. अशा वेळी एकत्रित बसावं लागतं. सगळे इतर नेते पण एकत्र बसतात. काही विषय राजकारण पलीकडे बघायचे असते. निवडणुका झाल्या आहे. जनतेच्या काही अपेक्षा आहे. माहिती, विचारांची देवाणघेवाण करणं ही आपली संस्कृती आहे, असं अजित पवार म्हणाले.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *