एच-१बी व्हिसा महाग; आयआयटी विद्यार्थ्यांसाठी नवे करिअर मार्ग खुले

मुंबई : अमेरिकेतील महागड्या H-1B व्हिसामुळे भारतीय तंत्रज्ञान संस्थांचे (IIT) विद्यार्थी फारसे चिंतीत नाहीत. कारण IIT कॅम्पसवर येणाऱ्या फक्त ५ ते ७ टक्के भरती कंपन्या परदेशी आहेत, तर बाकी बहुतेक जागतिक दिग्गज कंपन्यांची कार्यालये आता बेंगळुरू, हैदराबाद किंवा गुढगावमध्येच असल्याने विद्यार्थ्यांना परदेशात जाण्याची सक्ती राहिलेली नाही.

गेल्या तीन वर्षांत मोठ्या टेक कंपन्यांनी भारतात मोठ्या प्रमाणावर भरतीला सुरुवात केली आहे. पूर्वी विद्यार्थ्यांचा परदेशी जाण्याचा ‘ड्रीम पॅकेज’ आज थोडा विलंबाने पूर्ण होत असला तरी त्याची शक्यता कायम आहे. IIT मधील वरिष्ठ प्राध्यापकांच्या मते, आता विद्यार्थी प्रथम भारतात रुजू होतात, काही वर्षांनी कामगिरी सिद्ध झाल्यावरच परदेशी बदली होते.

अमेरिकेतील H-1B व्हिसा महाग आणि कठोर झाल्याने युरोप, जपान, कोरिया, सिंगापूरसारख्या देशांना भारतीय टॅलेंट आकर्षित करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे अमेरिकेचे आकर्षण कमी होऊ शकते, असा इशारा IIT संचालकांनी दिला. तर BITS चे कुलगुरू रमगोपाल राव यांनी अनुभव मिळालेल्या भारतीयांना परत देशात भरती करण्याचा ट्रेंड वाढेल, असे मत व्यक्त केले.

IIT बॉम्बेतील एका प्राध्यापकांच्या मते, आता कॅम्पसमध्ये जपानी कंपन्याही वाढत्या प्रमाणात दिसू लागल्या आहेत. अमेरिकेतील कंपन्यांना वाढत्या H-1B खर्चाचा फटका बसणार असून त्यामुळे US मध्ये मिळणाऱ्या ऑफर्स कमी होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम मुख्यत्वे अमेरिकेत जाण्यासाठी अर्जांची गर्दी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर होईल.

तथापि, IIT साठी हा मोठा संकट नसून फक्त कल्पित भीती असल्याचे प्लेसमेंट प्रमुखांनी सांगितले. त्यांचे म्हणणे आहे की अमेरिकेची संधी थोडी कमी होईल, मात्र भारतातून युरोप किंवा जपानपर्यंत, अगदी बर्लिनपर्यंतही करिअरच्या संधी विद्यार्थ्यांसमोर तितक्याच मोठ्या प्रमाणावर उपलब्ध राहतील.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *