भारतीय नौदल लढाईसाठी सज्ज; अरबी समुद्रातून डागली जहाजविरोधी क्षेपणास्त्रे

भारतीय नौदलाच्या युद्धनौकांनी अरबी समुद्रात हालचालींना गती देत नुकतेच अनेक जहाजविरोधी क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. भारतीय नौदलाच्या प्रवक्त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर ही माहिती दिली.या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे की, “भारतीय नौदलाच्या जहाजांनी लांब पल्ल्याच्या अचूक आक्रमणासाठी प्लॅटफॉर्म, प्रणाली आणि दलाची तयारी सिद्ध करण्यासाठी आणि क्षमता दाखवण्यासाठी जहाजविरोधी अनेक क्षेपणास्त्रे डागली. भारतीय नौदल देशाच्या सागरी हितांचे रक्षण करण्यासाठी कधीही, कुठेही, कसेही, लढाईसाठी सज्ज आहे.”. भारतीय नौदल कोणत्याही क्षणी, कुठेही, कसेही, देशाच्या सागरी हिताच्या रक्षणासाठी सज्ज आहे.”
या सरावाचा मुख्य हेतू म्हणजे नौदलाची लढाऊ सज्जता आणि सामरिक क्षमतेचं प्रात्यक्षिक दाखवणं, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. युद्धनौका सध्या अरबी समुद्रात तैनात असून, भारताच्या समुद्री सरहद्दीवर सुरक्षा मजबूत करण्यात आली आहे.या सरावाचे उद्दिष्ट नौदलाची लढाऊ तयारी आणि भारताच्या सागरी हितांचे रक्षण करण्याची क्षमता दाखवणे होते. या युद्धनौका अरबी समुद्रात तैनात करण्यात आल्या आहेत.२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे.

भारतीय नौदलाची युद्धनौका INS सुरत अलीकडेच अरबी समुद्रात मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी पार पाडली.विशेष म्हणजे, ही चाचणी पाकिस्तानच्या नौदलाकडून नियोजित जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र चाचणीच्या आधीच करण्यात आली होती.हवाई तसेच जमिनीवरील लक्ष्य भेदण्यात INS सुरत अत्यंत प्रभावी ठरली आहे. या युद्धनौकेची ही कामगिरी भारताच्या सागरी सुरक्षेला अधिक सक्षम करणारी ठरली आहे.
दुसरीकडे, २२ एप्रिलला जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातील सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे अलर्ट मोडवर आहेत. लष्कर, पोलिस आणि CRPF कडून सुरू असलेल्या संयुक्त कारवाईत गेल्या ४८ तासांत तब्बल ८ दहशतवादी अड्ड्यांचा खात्मा करण्यात आला आहे.लष्कराची ताजी कारवाई कुपवाडा येथे झाली, जिथे लष्कर दहशतवादी फारूक तेदवाचे घर उद्ध्वस्त करण्यात आले.

लष्कर, हिजबुल मुजाहिद्दीन आणि जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणांवर लष्कर छापे टाकत आहे. ज्या भागांमध्ये दहशतवादी हालचालींचा कणभरही संशय आहे, जिथे दहशतवादी हालचालींचा थोडासाही संशय असेल तिथे कडक कारवाई केली जात आहे. या पार्श्वभूमीवर खोऱ्यात आतापर्यंतची सर्वात मोठी शोधमोहीम राबवली जात असून, यामध्ये १००० हून अधिक संशयितांना अटक करण्यात आली आहे. या व्यक्तींवर दहशतवाद्यांना थेट किंवा अप्रत्यक्षपणे मदत केल्याचा आरोप आहे.
पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या हल्ल्याचा तपास आता राष्ट्रीय तपास संस्थाकडे सोपवण्यात आला आहे.गृह मंत्रालयाने यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *