मिशन रफ्तार; विरार-सूरत मार्गावर रेल्वेच्या वीजपुरवठ्यात दुपटीने वाढ

मुंबई : ‘मिशन रफ्तारप्रकल्पांतर्गत विरारसूरत रेल्वे मार्गावर वीजपुरवठा २x२५००० व्होल्टने दुप्पट केला जाणार आहे. हा प्रकल्प मुंबईअहमदाबाददिल्ली मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्यांचा वेग १६० किमी प्रति तास करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. दरम्यान, या आठवड्यात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव गुजरातमधील काही स्थानकांना भेट देऊन उच्चवेग रेल्वे प्रकल्पाची पाहणी करण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उच्चक्षमता असलेल्या केबल्स बसवण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. या कामाचा एकूण खर्च सुमारे६० कोटी असणार आहे. सध्या रेल्वे २५००० व्होल्ट विजेवर धावत आहेत, परंतु आता हा पुरवठा २x२५०००  व्होल्टने वाढवला जाणार आहे. तसेच, उच्चशक्तीच्या केबल्ससाठी आवश्यक खांब आणि इतर संरचना उभारण्यासाठी रेल्वे मार्गाच्या बाजूला जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

मुंबई अहमदाबाद प्रवासात ४५-६० मिनिटांची बचत होणार

या अद्ययावत वीजपुरवठ्यामुळे वंदे भारत, राजधानी आणि इतर प्रीमियम गाड्या  १६०  किमी प्रति तास वेगाने सहज धावू शकतील, ज्यामुळे सध्याच्या पायाभूत सुविधांवर येणारा ताण कमी होईल. पश्चिम रेल्वे आधीच उच्चवेगासाठी ट्रॅक सुधारण्याच्या कामात गुंतली आहे. गेल्या वर्षभरात पश्चिम रेल्वेने मुंबईअहमदाबाद मार्गावर १३० किमी प्रति तास वेगाने चाचण्या घेतल्या आहेत, ज्यामध्ये वंदे भारत स्लीपर ट्रेनचाही समावेश होता. एकदा रेल्वे प्रशासनाने  १६०  किमी प्रति तास वेगाने गाड्या चालवण्यास यश मिळवल्यास, मुंबईअहमदाबाद प्रवासाच्या वेळेत 45-60 मिनिटांची बचत होईल. सध्या हा प्रवास साधारणतः पाच तास २५ मिनिटे घेतो. मुंबईहून धावणाऱ्या पहिल्या सेमीहाय स्पीड मार्गांपैकी हा एक मार्ग असणार आहे.

पश्चिम रेल्वेने या मार्गावर १२० हून अधिक पूल मजबुतीकरण, १३८ पुलांचे पुनर्वसन आणि १३४ वळणांचे सरळिकरण यासारखी महत्त्वाची अभियांत्रिकी कामे पूर्ण केली आहेत. तसेच, ७९२ किमी लांबीपर्यंत सुरक्षेसाठी बॅरिअर्स उभारले आहेत, जेणेकरून नागरिक आणि जनावरे रेल्वे मार्गावर न शिरता सुरक्षित राहतील. सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी भारतीय रेल्वे कवच तंत्रज्ञानही वापरणार आहे.

…इतका खर्च अपेक्षित

या प्रकल्पासाठी पश्चिम रेल्वेच्या हद्दीत अंदाजे३९५९ कोटींचा खर्च अपेक्षित असून, संपूर्ण दिल्लीपर्यंतचा खर्च१०,००० कोटी असेल. सध्या मुंबईअहमदाबाद दरम्यान वंदे भारत, तेजस आणि शताब्दी यांसह ५० हून अधिक गाड्या धावत आहेत. मुंबई सेंट्रलबोरीवली दरम्यान १०० किमी प्रति तास आणि बोरीवलीविरार दरम्यान ११० किमी प्रति तास वेग मर्यादा आहे. दिल्लीमुंबई (,४७९ किमी) आणि दिल्लीहावडा (,५२५ किमी) हे दोन महत्त्वाचे मार्ग असून, त्यावर रेल्वे प्रशासन प्रवासाचा वेग वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे. मुंबईदिल्ली मार्गातील एकूण १,३७९ किमीपैकी सुमारे ५०% म्हणजे ६९४ किमी पश्चिम रेल्वेच्या अखत्यारीत येते, जे मुंबई सेंट्रलपासून नागदा (मध्य प्रदेश) पर्यंत पसरले आहे. उर्वरित मार्ग पश्चिममध्य आणि उत्तरी रेल्वेच्या कार्यक्षेत्रात मोडते.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *