सातारा : भारतावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तान सरकारचा सहभाग आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख तथा देशाचे माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांनी शुक्रवारी साताऱ्यातील एका कार्यक्रमात दिली. त्यांनी म्हटले ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात पाकिस्तानी सरकारी अधिकाऱ्यांची उपस्थिती हे स्पष्ट करते. पवार म्हणाले की, भारत एका गंभीर संकटाचा सामना करत आहे, परंतु देश आपल्या संरक्षण दलांच्या ताकदीने त्याला उत्तर देण्यास पूर्णपणे सक्षम आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षक भाऊराव पाटील यांच्या ६६ व्या पुण्यतिथीनिमित्त सातारा येथील रयत शिक्षण संस्थेत आयोजित कार्यक्रमात पवार (८०) बोलत होते.
त्यांच्या कन्या आणि लोकसभा सदस्या सुप्रिया सुळे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) अध्यक्ष अजित पवार हे देखील उपस्थित होते. शरद पवार म्हणाले, “भारताने कधीही दहशतवादी हालचालींना पाठिंबा दिलेला नाही. जे काही घडत आहे ते दहशतवादी कारवायांचे परिणाम आहे (पहलगाम हल्ला ज्यामध्ये २६ जणांनी आपले प्राण गमावले). पाकिस्तानने नकार दिला असला तरी, त्याचा सहभाग स्पष्ट आहे.”, असं ते म्हणाले.
पुढे बोलताना म्हणाले, “पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये भारतीय हल्ल्यात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांच्या सरकारचे प्रतिनिधी उपस्थित होते. जर त्यांच्या सरकारची कोणतीही भूमिका नव्हती, तर त्यांच्या अधिकाऱ्यांनी अंत्यसंस्कारांना उपस्थित राहण्याचा काय अर्थ आहे?” राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) नेत्याने सांगितले की, भारताने नेहमीच शांततेला पाठिंबा दिला आहे, पंतप्रधान आणि इतर नेत्यांनी ही भूमिका वारंवार अधोरेखित केली आहे. ते म्हणाले, आपली सशस्त्र सेना आवश्यक ती खबरदारी घेत आहे. त्याची कामगिरी पाहिल्यानंतर प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो. आज, भारतीय संरक्षण दल कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहेत.”
‘ऑपरेशन सिंदूर’ बद्दल माध्यमांना माहिती देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांचा उल्लेख करत पवार यांनी सशस्त्र दलात महिलांच्या वाढत्या सहभागाचे कौतुक केले आणि संरक्षण मंत्री असताना घेतलेल्या एका निर्णयाची आठवण करून दिली. ते म्हणाले, “मी संरक्षण मंत्री असताना, मी (सशस्त्र) दलांमध्ये महिलांनी प्रमुख भूमिका बजावण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. सुरुवातीला, तिन्ही दल प्रमुखांनी हा विचार नाकारला होता. परंतु चौथ्या बैठकीत, मी सशस्त्र दलांमध्ये महिलांचे किमान नऊ टक्के प्रतिनिधित्व असावे असा आग्रह धरला, अशी आठवण शरद पवार यांनी करून दिली.
Leave a Reply