बीड : जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील बालविवाहनंतर 15 वर्षांपेक्षाही लहान 10 मुली गर्भवती झाल्या असून 11 जणींची प्रसूती देखील झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या वर्षभरातील ही आकडेवारी आहे. आरोग्य विभागाच्या प्रजनन व बाल आरोग्य पोर्टलवरील नोंदीनुसार ही आकडेवारी समोर आली आहे. एप्रिल 2024 ते मार्च 2025 या कालावधीत बीड 4, गेवराई 2, वडवणी 2, आष्टी, केज, धारूर, शिरूर कासार येथील प्रत्येकी एकीचा समावेश आहे. आरोग्य विभागाच्या आरसीएच पोर्टलवर गर्भवतींच्या नोंदीत अल्पवयीन मुलींच्या पतींचं नावही आहे. त्यामुळे मुलींचे बालविवाह झाल्याचं यातून स्पष्ट होतं. गेल्या वर्षभरात १२ मुली गर्भवती झाल्या असून त्यातल्या १० मुलीचं वय फक्त १५ वर्षे इतकं होतं. तर बीड जिल्हा रुग्णालयात १३ ते १७ वयोगटातल्या ११ मुलींची प्रसूती झाली. यातल्या बहुतांश मुली या लैंगिक अत्याचाराच्या बळी होत्या . अरसीएच्या पोर्टलला नोंद करताना अधिकृत पुरावे द्यावे लागतात. यासर्व 12 मुलींच्या नावापुढे त्यांच्या पतीच्याही नावाचा उल्लेख आहे.
काय आहे बालविवाह प्रतिबंधक कायदा?
बालविवाह प्रतिबंधक कायदा, २००६ नुसार १८ वर्षाखालील मुलींचा आणि २१ वर्षांखालील मुलांचा विवाह बेकायदेशीर आहे.या काययद्यानुसार, बालविवाह लावून देणाऱ्या पालक, मध्यस्थ व नातेवाइकांना दंड आणि तुरंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. बालविवाहाची खळबळजनक आकडेवारी समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून बालविवाह रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे. बीडमध्ये साखर कारखान्यात काम करणाऱ्या स्थलांतरित मजुरांमध्ये बालविवाहांचं प्रमाण जास्त आहे. आर्थिक अडचणी मुलींच्या सुरक्षेची भीती यांसारख्या कारणांनी पालकांकडून मुलीच लग्न लावून दिलं जात. बालावेवाहांमुळे अल्पवयीन मुलींची गर्भधारणा, नवजात बाळासह मुलींच्या जीवालाही धोका निर्माण होतो. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात
Leave a Reply