महाराष्ट्र काँग्रेसच्यावतीने नागपूर येथून सद्भावना शांती मार्च आयोजित करण्यात आली आहे. या सद्भावना शांती मार्चमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सहभागी झाले. मात्र माजी प्रदेशाध्यक्ष तथा आमदार नाना पटोले मार्चमध्ये गैरहजर असल्याने दबक्या आवाजात तर्कवितर्क लावले जातात आहेत. या सद्रावना शांती मार्च मध्ये प्रभारी रमेश चेन्नीथला, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी कुणाल चौधरी यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
मात्र, माजी प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते नाना पटोले हे मात्र, या रॅलीला गैरहजर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता सर्वाच्याच भुवया उंचावल्या आहेत. सद्रावना शांती मार्च हा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, गांधी गेट महाल येथून सुरु होत असून कोतवाली पोलिस स्टेशन, बडकस चौक, चिटणीस पार्क, देवडीया भवन, भालवारपुरा चौक, गंजपेठ येथून राजवाडा पॅलेस येथे समारोप होईल.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले…
”राज्यात काही शक्ती जाणीवपूर्वक जातीधर्माच्या नावाखाली अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. नागपूरमध्ये मागील महिन्यात धार्मिक हिंसाचार उफाळला होता.त्यामागे याच शक्ती होत्या. राज्यात शांतता नांदावी ही काँग्रेसची भूमिका असून सामाजिक सद्भाव वाढीस लागला पाहिजे, याच हेतूने आज नागपूरमधये सद्भावना शांती मार्च आयोजित केला असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे
नागपूर हिंसाचारानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे व इतर नेत्यांची एक समिती गठीत करून नागपुरातील घटनास्थळाला भेट देण्याचा प्रयत्न केला पण स्थानिक पोलिसांनी काँग्रेसच्या समितीला परवानगी दिली नव्हती. काँग्रेस समितीने नागपूरमधील विविध संस्था
व नागरिक यांच्याशी चर्चा करुन संपूर्ण घटनेची माहिती घेतली राज्यपाल यांची मुंबईत राजभवन येथे भेट घेऊन या घटनेसंदर्भात एक निवेदनही सादर केले होते.सामाजिक सौहार्द व शांतता नांदावी यासाठी महाराष्ट्रप्रदेश काॉग्रेस कमिटीने हा सद्भावना शांती मार्च आयोजित केला असल्याचे सपकाळ यांनी सांगितले आहे
Leave a Reply