Category: News and Updates
-

“निवडणुका संपल्या की सर्व विसरायचं”; रविंद्र चव्हाण यांच्या वक्तव्याने महायुतीत तणाव शमल्याचे संकेत
•
राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांदरम्यान शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेशराजकारणावरून निर्माण झालेला तणाव अखेर शांत होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. प्रचारकाळात कल्याण–डोंबिवली, उल्हासनगर आणि परिसरात दोन्ही पक्षांतील पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशामुळे संघर्ष तीव्र झाला होता. याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केलेले विधान महत्त्वाचे मानले जात आहे. “निवडणुका संपल्या की सर्व विसरायचं…
-

अवधूत साठे यांच्यावर सेबीची मोठी कारवाई; ६०१ कोटी गुंतवणूकदारांना परत करण्याचे आदेश
•
शेअर बाजारातील चर्चित प्रशिक्षणकर्ता अवधूत साठे आणि त्यांच्या ‘अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमी’वर भांडवली बाजार नियामक सेबीने कठोर कारवाई केली आहे. साठे यांना तात्काळ प्रभावाने शेअर बाजारातील कोणत्याही प्रकारच्या व्यवहारांवर बंदी घालण्यात आली असून, गुंतवणूकदारांकडून गोळा केलेले तब्बल ६०१ कोटी रुपये परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सेबीने जारी केलेल्या १२५…
-

मुंबईत “क्लायमेट वीक”ला मिळणार आंतरराष्ट्रीय व्यासपीठ !
•
मुंबई : पर्यावरण क्षेत्रातील जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अर्थशॉट प्राईजचे आयोजन पुढील वर्षी मुंबईत होणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा आज करण्यात आली. अर्थशॉट प्राईजचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेसन नॉफ यांनी महाराष्ट्रातील वरिष्ठ नेतृत्वाची भेट घेतली आणि आगामी कार्यक्रमाच्या तयारीबाबत चर्चा केली. जेसन नॉफ यांच्यासोबत त्यांच्या टीमचाही समावेश असून,…
-

महायुती सरकार पायाभूत सुविधांमध्ये अव्वल; फडणवीस यांच्या नेतृत्वाला जनतेची सर्वाधिक पसंती
•
‘सकाळ माध्यम समूहा’ने राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त केलेल्या सर्वेक्षणातून महायुती सरकारच्या पायाभूत सुविधा विकासाबाबत महत्त्वपूर्ण निष्कर्ष समोर आले आहेत. या सर्वेक्षणात विविध काळातील मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात किती आणि कशाप्रकारे पायाभूत सुविधांवर काम झाले, याबाबत नागरिकांची मते जाणून घेण्यात आली. त्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात सर्वाधिक कामगिरी केल्याचे…
-

इंडिगो उड्डाणे कोलमडली: दिल्लीसह देशभरात १,३०० हून अधिक फ्लाइट रद्द
•
दिल्ली विमानतळावर गेल्या चार दिवसांत निर्माण झालेल्या गंभीर अव्यवस्थेमुळे इंडिगोच्या सर्व देशांतर्गत उड्डाणांना शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत रद्द करण्यात आले, अशी माहिती विमानतळ प्राधिकरणाने X वर दिली. मात्र त्याच वेळी DGCA मधील सूत्रांनी ही रद्दीकरणे फक्त दुपारी ३ वाजेपर्यंत असल्याचे सांगितले. या परस्परविरोधी माहितीनंतर प्रवाशांमध्ये प्रचंड संभ्रम आणि नाराजी पसरली आहे. गुरुवारी…
-

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची चौकशी सुरू; १७ वर्षांचे आर्थिक व्यवहार तपासणीखाली
•
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी अधिकृतरित्या सुरू झाली असून साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीने २००९ ते २०२५ या १७ वर्षांतील सर्व आर्थिक ताळेबंद, लेखा अहवाल आणि अनुदान विनियोगाशी संबंधित कागदपत्रे संस्थेकडून मागवली आहेत. राज्य सरकारकडून संस्थेला मिळालेल्या अनुदानाचा…
-

एक महिन्यात मोदी राजीनामा देणार आणि ‘मराठी माणूस’ कसा पंतप्रधान होणार ? पृथ्वीराज चव्हाण असे का म्हणाले?
•
महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाखालील महायुती सरकार , ५ डिसेंबर रोजी, आपला पहिल्या वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करत आहे. फडणवीस, शिंदे , पवार सरकारसाठी, हे वर्ष, एखाद्या विलक्षण वेगवान ‘रोलर कोस्टर राईड’, प्रमाणे प्रचंड चढउताराचे गेले. पण सरकारची ‘स्टीयरिंग’ वरील पकड कधी ढिली पडली नाही. गाडी कधीच रस्ता सोडून खाली उतरली नाही… या…
-

चीनमध्ये कंडोमवर ‘महाकाय’ कर; तज्ञांनी व्यक्त केली सार्वजनिक आरोग्याबाबत चिंता
•
लोकसंख्या वाढवण्यासाठी विविध उपाययोजना करत असलेल्या चीनने आता कंडोम आणि इतर गर्भनिरोधक साधनांवर पुन्हा कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल ३० वर्षांनंतर प्रथमच या उत्पादनांवर व्हॅल्यू ॲडेड टॅक्स (VAT) लागू केला जाणार आहे. सुधारित कर कायद्यानुसार कंडोमवर १३ टक्के VAT आकारला जाईल. विशेष म्हणजे १९९३ पासून ही उत्पादने करमुक्त होती.…
-

जिल्हा परिषद निवडणुका दोन टप्प्यात? आरक्षण मर्यादा ओलांडल्याने आयोगाचा विचार सुरू
•
राज्यातील जिल्हा परिषद निवडणुका दोन टप्प्यात घेण्याचा गंभीर विचार राज्य निवडणूक आयोगाकडून होत असल्याची माहिती समोर आली आहे. ५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडल्याच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयात २१ जानेवारीला सुनावणी होणार असल्याने, आरक्षण मर्यादा न ओलांडलेल्या जिल्ह्यांच्या निवडणुका आधी घेण्याचे नियोजन सुरू आहे. राज्यातील एकूण ३२ जिल्हा परिषदांपैकी तब्बल १७ ठिकाणी…
-

समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांचे ९३व्या वर्षी निधन
•
सोलापूर – प्रख्यात समाजवादी विचारवंत, राष्ट्रसेवक आणि ज्येष्ठ पत्रकार पन्नालाल सुराणा यांचे ९३ व्या वर्षी सोलापूर येथे निधन झाले. मागील काही दिवसांपासून प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मंगळवारच्या उशिरा एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. सुराणा यांनी समाजातील पीडित, शोषित आणि वंचित…
