Category: News and Updates
-

भ्रष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांची आता खैर नाही; संपत्ती तपासली जाणार : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
•
आता भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची काही खैर नाही, असंच म्हणावं लागेल. त्याचे कारण म्हणजे, भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी यांची सर्व्हिसदरम्यान संपत्ती कितो वाढली, हे तपासणार असल्याचं महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते म्हणाले आमच्या सरकारमध्ये पैसे घेऊन काम करणे असे चालणार नाही. राज्यात अनेक भ्रष्ट अधिकारी आहेत ज्यांना अँटी करप्शन…
-

शेतकऱ्यांना रात्रीच्याऐवजी दिवसा लाईट मिळणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा
•
सध्या दिवसा लोडशेडिंग असल्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी पिकांना पाणी द्यायला जावं लागतं. रात्रीच्या अंधारात हिंस्त्र प्राण्यांसह इतर संकटांना शेतकऱ्यांना तोंड द्यावं लागतं. म्हणून शेतकऱ्यांना रात्रीच्याऐवजी दिवसा लाईट देणार असल्याचं आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिले. अजित पवार संभाजी नगर जिल्ह्यातील वाळूज येथे संवाद उद्योजकांशी या कार्यक्रमाचे आयोजन…
-

“भूतकाळात काँग्रेसने अनेक चुका केल्या, त्याची जबाबदारी मी स्वीकारतो”; राहुल गांधींची कबुली
•
”काँग्रेसने भूतकाळात अनेक चुका केल्या आहेत, त्याची जबाबदारी मी स्वीकारतो”, असे विधान काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले आहे.अमेरिका दौऱ्यावर असताना त्यांनी 21 एप्रिल रोजी ब्राऊन विद्यापीठात एका संवाद सत्रात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. माजी पंतप्रधान तथा त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांच्या…
-

बारावीचा निकाल जाहीर; पासिंग टक्केवारी घसरली तर कोकणाने पुन्हा मारली बाजी
•
राज्यात आज दुपारी (सोमवारी) 1 वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (बारावी) परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. राज्यात 91.88 विद्यार्थी पास झाले असून यंदाही कोकण विभागाने बाजी मारली आहे. यावर्षी पासिंग टक्केवारी थोडीशी घसरून ९१.८८% वर आली आहे. मागील वर्षीच्या ९३.३७% उत्तीर्णतेच्या टक्केवारीच्या तुलनेत, या वर्षीच्या निकालात…
-

हवामान विभागाकडून मुंबईसह शेजारच्या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी
•
देशाच्या अनेक भागात वादळी हवामान असताना, भारतीय हवामान विभागाने (IMD) मंगळवारपासून मुंबई आणि त्याच्या शेजारील जिल्ह्यांमध्ये येल्लो अलर्ट जारी केला आहे. वादळांसह हलक्या ते मध्यम सरी आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. पूर्व-मान्सूनच्या पावसामुळे दिवसाच्या उष्णतेच्या पातळीतही घट होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान जवळजवळ ३१ अंशांपर्यंत घसरण्याचा अंदाज…
-

‘एआय’मुळे मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील वाढू शकतो १०% महसूल; विश्लेषणातून आले समोर
•
मुंबई : सध्या एआयचा बोलबाला आहे. एआय मीडिया आणि मनोरंजन उद्योगात क्रांती घडवत असताना, त्याचा वापर आता उद्योगाला अधिक फायदेशीर करण्यासाठी केला जाणार आहे. मीडिया आणि मनोरंजन (एम अँड ई) उद्योगावरील सल्लागार कंपनी अर्न्स्ट अँड यंगच्या अहवालात असे सुचवण्यात आले आहे की, एआय केवळ महसूल दहा टक्क्यांनी वाढविण्यास मदत करत…
-

लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचा हफ्ता जमा व्हायला सुरू
•
लाडक्या बहिणीचा एप्रिल महिन्याचा 1500 हजाराचा हफ्ता बँक खात्यात जमा व्हायला सुरू झालं आहे. हा 10वा हफ्ता असून आत्तापर्यंत लाडक्या बहिणींना 15 हजार रुपये या योजनेच्या माध्यमाने मिळाले आहे. महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून सुरु केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता…
-

राज्यात पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा
•
भारतीय हवामान विभागाने राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सध्या राज्यात उष्णतेने नागरिक हैराण आहेत. अशातच आता विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. पुढील चार दिवस मिश्र स्वरुपाचे वातावरण राहण्याचा…
-

मुंबईकरांना दिलासा, NEET च्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर रविवारचा रेल्वे ब्लॉक रद्द
•
या रविवारी 4 मे रोजी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचं कारण म्हणजे रविवारी होणाऱ्या NEET च्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने साप्ताहिक मेगाब्लॉक रद्द केला आहे. त्यामुळे रविवारी लोकलने प्रवास करणाऱ्याना मोठा दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वेने जारी केलेल्या निवदेनात, “NEET परीक्षा देणारे विद्यार्थी आणि त्यांच्या सोबतच्या कुटुंबातील सदस्यांना सुरळीत…
-

भारत देश आयफोनच्या निर्मितीचा मुख्य केंद्र बनणार : अॅपल सीईओ टिम कुक
•
लवकरचं भारत देश आयफोनच्या निर्मितीचा मुख्य केंद्र बनणार असल्याचं स्वतः सीईओ टीम कुक हे म्हणाले. अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी अलिकडच्या एका मुलाखतीत म्हटले आहे की, अमेरिकेच्या बाजारपेठेत विकले जाणारे ५०% आयफोन भारतात तयार केले जात आहेत. कुक म्हणाले की, भारत लवकरच अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या आयफोनचा मूळ देश बनेल. ते…
