Category: News and Updates
-

तीव्र उष्णता आणि कीटकांचा भाजीपाल्यांवर मोठा परिणाम; उत्पादन घटले
•
देशभरात वाढलेल्या उष्णतेच्या लाटेचा आणि पिकांवर हल्ला करणाऱ्या मावा कीटकांच्या प्रचंड प्रादुर्भावाचा भाजीपाल्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे लवकरच भाज्यांचे दर वाढण्याची शक्यता असून नागरिकांच्या खिशावर याचा थेट परिणाम होणार आहे. गेल्या काही आठवड्यांपासून देशातील अनेक भागांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. अशा तीव्र उष्णतेमुळे भाजीपाला पिके…
-

“काँग्रेसचे नेते वादग्रस्त विधाने करून नव्या वादाला तोंड फोडत आहेत”, भाजप नेत्याचा आरोप
•
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली असतानाच काँग्रेसचे काही नेते वादग्रस्त विधाने करून नव्या वादाला तोंड फोडत आहेत,अशी जोरदार टीका भाजपाने केली आहे.भाजपाचे वरिष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला असून, त्यांनी म्हटले की “काँग्रेस नेत्यांच्या बेजबाबदार विधानांचा वापर पाकिस्तान भारताची प्रतिमा मलीन करण्यासाठी करत आहे.…
-

दोघांनी 44 डझन आंबे घेऊन फळविक्रेत्याची अशी केली फसवणूक; गुन्हा दाखल
•
मुंबई पोलिसांनी रविवारी आंबे विक्रेत्याला खोटा चेक दिल्याप्रकरणी दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांदिवलीतील एका फळ विक्रेत्याकडून ४४ डझन आंब्यांची खरेदी केली आणि त्याला चेक दिला, जो नंतर बाऊन्स झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी विक्रेत्याला सांगितले की, हे आंबे दादर येथील एका मंदीरात वाटप करण्यासाठी घेतले जात आहेत.…
-

बिल्डरच्या आत्महत्येनंतर मिळाली ड्रग्ज प्रकरणाची लीड; दोन पोलिस ताब्यात
•
नवी मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक गुरुनाथ चिचकर यांच्या आत्महत्येनंतर ड्रग्ज कार्टेलशी संबंधित एक मोठा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणात रविवारी दोन पोलिस कर्मचार्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे कर्मचारी चिचकर यांच्या मुलांच्या विरोधात सुरू असलेल्या अंमली पदार्थ प्रकरणाच्या तपासात सहभागी होते. गुरुनाथ चिचकर यांनी मागील शुक्रवारी बेलापूर येथील त्यांच्या…
-

महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही – देवेंद्र फडणवीस
•
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार ज्या पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत, त्यांच्याबाबत महाराष्ट्रात ठोस कारवाई झाली असून सर्व संबंधित नागरिक सापडले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.ते पुढे म्हणाले की,ज्यांना भारत सोडावे लागणार आहे, त्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत आणि त्यांचे ट्रॅकिंगही सुरू आहे. कोणताही असा…
-

४ वर्षांच्या चिमुरड्यावर अत्याचार : शाळेबाहेर संतप्त पालकांचा आक्रोश
•
नवी मुंबईतील एका नामांकित शाळेत अवघ्या चार वर्षांच्या विद्यार्थ्यावर शाळेच्या व्हॅन चालकाने कथित लैंगिक अत्याचार केल्याच्या संतापजनक घटनेने पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेविरोधात शेकडो संतप्त पालकांनी सोमवारी सकाळी शाळेबाहेर जोरदार निदर्शने करत प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आणि कठोर कारवाईची मागणी केली. ही धक्कादायक घटना २२ एप्रिल रोजी…
-

पहलगाम हल्ल्यानंतर ओवेसी आक्रमक: पाकिस्तानसाठी भारतीय हवाई क्षेत्र बंद करण्याची मागणी
•
एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सोमवारी केंद्र सरकारला पाकिस्तानविरुद्ध सायबर हल्ला सुरू करण्याची आणि शेजारी देशासाठी भारतीय हवाई क्षेत्र बंद करण्याची मागणी केली. ते पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात बोलत होते. ओवैसी म्हणाले, “निरपराध लोकांचा जीव घेणे हे अत्यंत घृणास्पद कृत्य आहे, आणि तेही धर्माच्या आधारावर. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी…
-

स्पेन-पोर्तुगालची बत्ती गुल; वीज पुरवठा खंडित झाल्याने वाहतूक ठप्प, विमान उड्डाण रद्द
•
स्पेन आणि पोर्तुगालमध्ये आठवड्याच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणावर वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या अचानक झालेल्या ब्लॅकआउटमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णतः ठप्प झाली असून, अनेक भागांत गंभीर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. विमानांच्या उड्डाणांनाही विलंब होऊ लागला असून, प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.दरम्यान, युटिलिटी ऑपरेटर वीजपुरवठा पूर्ववत…
-

मुलगी UPSC पास झाली; आनंद साजरा करताना वडिलांचा हृदयविकाराने मृत्यू
•
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील वागद ईजारा गावातून एक अत्यंत भावनिक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आपल्या मुलीने युपीएससी परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण करून आयएएस पदावर निवड झाल्याचा आनंद साजरा करत असताना वडिलांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. या अनपेक्षित घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.…
-

पाकिस्तानी नागरिकाला भारतीय मातेकडून 9 मुलं; गुंतागुंतीचं प्रकरण थेट केंद्र सरकारकडे
•
पाकिस्तानी नागरिक असलेल्या वडिलांचे पालकत्व लाभलेल्या आणि भारतीय मातांकडून जन्मलेल्या नऊ मुलांचे प्रकरण मध्य प्रदेश सरकारसमोर एक गंभीर आणि गुंतागुंतीचा मुद्दा बनला आहे. केंद्र सरकारने अशा नागरिकांना भारतातून तात्काळ बाहेर जाण्याचे निर्देश दिले असून, या पार्श्वभूमीवर भोपाळमध्ये २५ एप्रिल रोजी एका पाकिस्तानी नागरिकाने दीर्घकालीन व्हिसासाठी (एलटीव्ही) अर्ज केला होता. मात्र…
