Category: News and Updates
-

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मनसेचा मोठा निर्णय; मनसैनिक काश्मीरला जाणार
•
काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करुन 26 भारतीयांचा जीव घेतल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. तर, दुसरीकडे आता मनसेने देखील दहशतवादी कृत्याला सडेतोड उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. आज मुंबईत मनसेचे नेते आणि मुंबईचे अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी दहशतवादी कृत्यावर…
-

होर्डिंग्जच्या माध्यमातून किमान १०० कोटी महसूल संकलनाचे उद्धिष्ट ठेवा; नितेश राणेंच्या अधिकाऱ्यांना सूचना
•
होर्डिंग्जच्या माध्यमातून किमान १०० कोटी महसूल संकलनाचे उद्धिष्ट ठेवावे. तसेच यासाठी स्पर्धा निर्माण करावी. खुल्या निविदा मागवाव्यात, आशा सूचना मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केल्या आहेत. होर्डिंग महामंडळाने स्वतः उभारावीत, त्यावरील जाहिरातीचे हक्कविक्री करावी. अशा पद्धतीने महसूलवाढीसाठी मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले. पुढे बोलताना राणे म्हणाले,…
-

न्यायालय अवमान प्रकरणात सोसायटी सदस्य दोषी; एक आठवडा साध्या कारावासाची शिक्षा आणि आर्थिक दंड
•
मुंबई उच्च न्यायालयाने नवी मुंबईतील सीवूड्स इस्टेट सोसायटीच्या व्यवस्थापन समितीतील सदस्य विनीता श्रीनंदन यांना न्यायालय आणि न्यायाधीशांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी दोषी ठरवत एक आठवड्याच्या साध्या कारावासाची शिक्षा आणि ₹२,००० रुपयांचा दंड ठोठावला आहे. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर हा खटला सुनावणीस आला. खंडपीठाने श्रीनंदन यांनी ईमेल्स…
-

विधानपरिषद सभापती राम शिंदे यांच्या सुरक्षेत गंभीर त्रुटी; पोलिसांवर कारवाईचा बडगा
•
विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या बारामती दौऱ्याप्रसंगी सुरक्षा व राजशिष्टाचारात कसूर झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यांच्या दौऱ्यादरम्यान सुरक्षाविययक गंभीर त्रुटी आढळून आल्याप्रकरणी पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. याप्रकरणी तीन पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली असून दोषी पोलिसांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. एक वरिष्ठ पोलीस…
-

पुणे एफटीआयआयला अभिमत विद्यापीठाचा दर्जा; भारतीय चित्रपट शिक्षण क्षेत्रात नवा अध्याय
•
भारतातील चित्रपट शिक्षणाच्या क्षेत्रात अग्रणी असलेल्या ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ (एफटीआयआय), पुणे या प्रतिष्ठित संस्थेला केंद्र सरकारच्या शिक्षण विभागातर्फे अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे. ही मान्यता मिळाल्यानंतर एफटीआयआय आता पदव्या प्रदान करण्यास अधिकृतपणे पात्र ठरणार आहे. याचबरोबर, कोलकात्याच्या सत्यजित राय फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटलाही (SRFTI) हा दर्जा…
-

पीओपी समर्थक याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयाचा सल्ला; ”निकालाची प्रतीक्षा न करता इतर पर्याय अवलंबा”
•
पीओपी समर्थक मूर्तिकारांना उच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान सल्ला दिला. न्यायालयाचं असं म्हणणं आहे की, उच्च न्यायालयातील सुनावणीत काय होते, याची प्रतीक्षा न करता तुम्ही आताच पीओपीला असलेल्या पर्यायाचा अवलंब करायला हवा. दूरदर्शी व जबाबदार नागरिक म्हणून तुम्ही हे करायला हवे कारण ते भावी पिढ्यांसाठी चांगले ठरेल’, असा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाने…
-

कलमा म्हणताच वाचला जीव; प्राध्यापक देबाशिष भट्टाचार्य यांचा पहलगाममधील थरारक अनुभव
•
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगामच्या बैसनर खोऱ्यात मंगळवारी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाला असून, २० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यात आसाम विद्यापीठाचे असोसिएट प्राध्यापक देबाशिष भट्टाचार्य यांचा जीव मात्र त्यांच्या प्रसंगावधानामुळे थोडक्यात वाचला. त्यांनी स्वतःचा व त्यांच्या कुटुंबाचा जीव एका युक्तीने वाचवला, याबाबतचा अनुभव…
-

महसूलच्या अधिकाऱ्यांना तंबी; परवानगीशिवाय मुख्यालय सोडल्यास होणार शिस्तभंगाची कारवाई
•
महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना परवानगीशिवाय मुख्यालय न सोडण्याची तंबी देण्यात आली आहे. अधिकारी किंवा कर्मचारी वरिष्ठांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडत असल्यास त्यांच्यावर निलंबन किंवा शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. महसूल विभागाकडून परिपत्रक काढून हा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आलेल्या तक्रारीत तथ्य आढळून आल्यानंतर तातडीने हे परिपत्रक…
-

दहावीच्या परीक्षेत ६०० पैकी ६०० गुण; काकीनाडाच्या नेहानजलीची उत्तम कामगिर
•
आंध्र प्रदेशातील काकीनाडा ग्रामीण जिल्ह्यातील भश्याम शाळेची विद्यार्थिनी येल्ला नेहानजली हिने २०२५ च्या दहावी (एसएससी) बोर्ड परीक्षेत सर्व विषयांमध्ये १०० पैकी १०० गुण मिळवून इतिहास रचला आहे. तिच्या या अपूर्व यशामुळे शिक्षण क्षेत्रात नव्या उंचीला स्पर्श झाला आहे. नेहानजलीच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे केवळ गोदावरी जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात आनंदोत्सवाचे…
-

डॉक्टरांवरील हल्ल्यांसंबंधीच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या; म्हणाले, ‘प्रत्येक गोष्टीवर न्यायालय लक्ष ठेवू शकत नाही’
•
प्रत्येक कृतीवर न्यायालयाने लक्ष ठेवावे आणि सर्व काही न्यायालयाने करावे, अशी अपेक्षा धरता येणार नाही, असं म्हणत डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यासंदर्भात दाखल याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. सगळे काही न्यायालयाने करावे, अशी अपेक्षा धरता येणार नाही, असे वक्तव्य न्यायालयाने केले आहे.न्या. बेला एम. त्रिवेदी आणि प्रसन्ना बी. वराले यांच्या खंडपीठाने…
