Category: News and Updates
-

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘इनोव्हेशन महाकुंभ 2025’ चे उद्घाटन; महाराष्ट्र ‘स्टार्टअप राजधानी
•
एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या जुहू कॅम्पसवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘इनोव्हेशन महाकुंभ 2025’ या स्टार्टअप कार्यक्रमाचे रविवारी भव्य उद्घाटन करण्यात आले. या वेळी विद्यापीठाच्या प्री-इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटन करण्यात आले, तसेच वैद्यकीय, कृषी आणि वाहतूक व्यवस्थापन क्षेत्रातील तीन नवकल्पनांना गौरविण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक…
-

‘भारतीय काव्यशास्त्रातील गोपन आणि शोधन’ विषयावर विंदा करंदीकर स्मृती व्याख्यान
•
मुंबई — प्रख्यात कवी विंदा करंदीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित विंदा करंदीकर स्मृती व्याख्यान या विशेष कार्यक्रमाचे आयोजन यंदा “भारतीय काव्यशास्त्रातील गोपन आणि शोधन” या विषयावर करण्यात आले आहे. हा कार्यक्रम हजारिमल सोमनाणी वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय आणि श्रीमती कुसुमताई चौधरी कला महाविद्यालय (स्वायत्त), बांद्रे (पूर्व), मुंबई यांच्या वतीने, विंदा करंदीकर…
-

इच्छामरणाचे प्रणेते प्रा. सदानंद वर्दे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
•
मुंबई | ज्येष्ठ समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत आणि माजी शिक्षणमंत्री प्रा. सदानंद वर्दे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वर्दे मित्रमंडळ आणि परिवाराच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवार, ६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता, वांद्रे (पश्चिम) येथील नॅशनल कॉलेजच्या सभागृहात पार पडणार आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक व…
-

महाराष्ट्रावर पुन्हा मोठं संकट! हवामान विभागाचा इशारा; 10 जिल्ह्यांना ‘हाय अलर्ट’
•
राज्यात नुकत्याच ओसरलेल्या पावसानंतर नागरिकांना दिलासा मिळणार असं वाटत असतानाच पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासाठी मोठा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वाढली आहे. पुढील तीन ते चार दिवस महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांना ‘हाय अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे. पुन्हा पावसाची…
-

उद्धव ठाकरेंचं शेतकऱ्यांना आवाहन: “कर्जमुक्ती मिळेपर्यंत सरकारला मत नाही”; भाजपचा पलटवार
•
धाराशिव : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होत असतानाच उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौऱ्यातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला घेरलं आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी दरम्यान ठाकरे म्हणाले, “जूनची कर्जमाफी आम्हाला मान्य नाही. जोपर्यंत कर्जमुक्ती नाही, तोपर्यंत सरकारला मत देऊ नका. प्रत्येक गावात असा बोर्ड लावा,” असं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलं. ठाकरे…
-

संजय राऊत यांची तब्ब्येत बिघडली; उपचारासाठी रूग्णालयात दाखल
•
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांची तब्ब्येत बिघडल्याची माहिती समोर आली आहे. प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना भांडूप येथील फोर्टिस रूग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या ते वैद्यकीय देखरेखीखाली आहेत. राऊत यांच्या आरोग्याची तपासणी डॉक्टरांच्या पथकाकडून सुरू आहे आणि पुढील उपचार त्याच ठिकाणी केले जाणार आहेत. काही दिवसांपूर्वीच…
-

भाजीविक्रेत्याचं नशीब फळलं! उधारीवर घेतलेलं लॉटरी तिकीट ठरलं ‘जॅकपॉट’, तब्बल ११ कोटींचा बंपर लाभ
•
ते म्हणतात ना – नशिब कधी, कुठे आणि कसं पलटी मारेल, सांगता येत नाही! राजस्थानातील एका साध्या भाजीविक्रेत्याच्या आयुष्यात अगदी असाच चमत्कार घडला आहे. राजस्थानच्या जयपूर जिल्ह्यातील कोटपुतली येथील भाजीविक्रेता अमित सेहरा यांनी पंजाब राज्य लॉटरी – दिवाळी बंपर २०२५ मध्ये तब्बल ११ कोटी रुपयांचे बक्षीस जिंकले आहे. विशेष म्हणजे,…
-

वाकेश्वर बाणगंगेच्या महाआरतीला जी.एस.बी. टेम्पल ट्रस्ट तर्फे तब्बल ₹२४९ कोटींचा विमा
•
मुंबई | दरवर्षी त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त वाकेश्वर येथील प्रसिद्ध ‘बाणगंगेची महाआरती’ मोठ्या उत्साहात पार पडते. यंदाही बुधवार, ५ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत या महाआरतीचे आयोजन करण्यात येणार आहे. भाविकांची वर्षागणिक वाढणारी गर्दी लक्षात घेता, जी. एस. बी. टेम्पल ट्रस्टने या कार्यक्रमासाठी विशेष तयारी केली आहे. भाविकांच्या…
-

246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर; 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबरला निकाल
•
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणुका जाहीर करण्यात आल्या असून 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे, तर मतमोजणी 3 डिसेंबरला होणार आहे. त्यासोबतच आज, 4 नोव्हेंबरपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. राज्यातील 29 महापालिका, 32 जिल्हा परिषदा, 42 नगरपंचायती, 336 पंचायत…
-

तामिळनाडू भाजपात अंतर्गत कलह वाढला; अन्नामलाईंच्या वक्तव्यामुळे नवा चर्चेचा भडका
•
तामिळनाडू : तामिळनाडू भाजपात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या अंतर्गत कलहाला आता अधिक हवा मिळाली आहे. एप्रिल महिन्यात पक्षाने के. अन्नामलाई यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवून त्यांच्या जागी नैनार नागेंद्रन यांची नियुक्ती केली होती. या निर्णयानंतर भाजपातील नाराजी आणि गटबाजी वाढल्याचं चित्र आहे. अन्नामलाई हे तामिळनाडूमधील भाजपाचे तरुण आणि लोकप्रिय नेते मानले…
