Category: News and Updates
-

सरकार चर्चेला तयार, पण बच्चू कडू बैठकीला गैरहजर : बावनकुळे
•
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी नागपूरमध्ये सुरू असलेल्या बच्चू कडू यांच्या ठिय्या आंदोलनाबाबत सरकार चर्चेस तयार असूनही कडू बैठकीला उपस्थित राहत नसल्याचे राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. बावनकुळे म्हणाले, “आंदोलन सुरू झाल्यानंतर 26 तारखेला मी स्वतः बच्चू कडूंशी बोललो. 27 आणि 28 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री…
-

छत्रपती संभाजीनगरातून अमेरिकन नागरिकांची ऑनलाइन फसवणूक उघड, ११६ जणांना अटक
•
छत्रपती संभाजीनगर : अमेरिकन नागरिकांना कर चुकविल्याची भीती दाखवून ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शहरातील चिकलठाणा औद्योगिक परिसरातील एका चार मजली इमारतीत हे अवैध कॉल सेंटर चालवले जात होते. सोमवारी मध्यरात्री १.२० वाजता टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी तब्बल ११६ जणांना अटक केली. या आरोपींमध्ये एक…
-

आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; जानेवारी २०२६ पासून अंमलबजावणीची शक्यता
•
नवी दिल्ली : केंद्र सरकारने अखेर आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेस मंजुरी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रंजन प्रकाश देसाई यांची आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून, आयोगाला अंतिम अहवाल सादर करण्यासाठी १८ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. या आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी १ जानेवारी २०२६ पासून होण्याची शक्यता व्यक्त केली…
-

वैद्यकीय प्रवेशप्रक्रियेत गोंधळ; १५२ विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची चौकशी सुरू
•
महाराष्ट्रातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत पुन्हा एकदा गोंधळाचे सावट दिसत आहे. राज्याच्या कॉमन एंट्रन्स टेस्ट (CET) सेलने वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीतील प्रवेश प्रक्रियेदरम्यान चुकीची कागदपत्रे सादर करणाऱ्या १५२ विद्यार्थ्यांवर चौकशी सुरू केली आहे. सीईटी सेलच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, नव्याने नोंदणी केलेल्या काही उमेदवारांच्या कागदपत्रांमध्ये विसंगती आढळली. प्राप्त तक्रारींनंतर तपास करण्यात आला असता या…
-

सायकल मार्गिकेवरील अतिक्रमण आणि कचऱ्यावर न्यायालयाचा कोरडा शेरा
•
मुंबई : सायन (पूर्व) येथील फ्लँक रोडवरील बंद पडलेली सायकल मार्गिका त्वरित स्वच्छ करून वापरासाठी खुली करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने महानगरपालिकेला दिले आहेत. या मार्गिकेवर कचरा, राडारोडा आणि अनधिकृत वाहनांचा कब्जा झाल्याने वाहतूक कोंडी, ध्वनीप्रदूषण आणि आपत्कालीन सेवांना अडथळा निर्माण होत असल्याचा मुद्दा याचिकेद्वारे न्यायालयासमोर मांडण्यात आला होता.…
-

निवडणुकीआधी ‘कास्ट व्हॅलिडिटी’चा प्रश्न निकाली; उमेदवारांना सहा महिन्यांची सवलत
•
राज्यातील आगामी महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायत तसेच ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राखीव जागांवर निवडून येणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) सादर करण्यासाठी आता सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार मुंबई…
-

उदय सामंत यांच्या पत्नीच्या संस्थेकडे राज्य बालनाट्य स्पर्धा; कलावंतांचा विरोध
•
मुंबई : राज्यातील प्रसिद्ध राज्य बालनाट्य स्पर्धा आणि दिव्यांग बालनाट्य स्पर्धेच्या समन्वयाची जबाबदारी यंदा खासगी संस्थेकडे देण्यात आली असून, त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ही जबाबदारी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के सामंत यांच्या अध्यक्षतेखालील ‘बालरंगभूमी परिषद’ या संस्थेकडे सोपविण्यात आली आहे. यावर कलावंत संघटनांनी आणि सांस्कृतिक क्षेत्रातील…
-

सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा; प्रकल्पांच्या झाडतोड परवानग्या रद्द होण्याची शक्यता
•
मुंबई : शहरातील विविध विकास प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर झाडांची तोड करण्यात आली असताना, त्याबदल्यात होणाऱ्या भरपाई वनीकरणाची अंमलबजावणी नीट न झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला तीव्र शब्दांत फटकारले. न्यायालयाने मुंबई मेट्रो रेल्वे, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (जीएमएलआर) आणि तत्सम प्रकल्पांसाठी दिलेल्या झाडतोड परवानग्या रद्द करण्याचा इशाराही दिला आहे. मुंबई महानगरपालिकेने…
-

‘भाजप कुबड्यांवर नव्हे, स्वबळावर मजबूत’ अमित शहा यांचे सूचक वक्तव्य
•
मुंबई : महाराष्ट्रातील भाजप आता कोणाच्याही “कुबड्यांवर” अवलंबून नसून स्वतःच्या बळावर मजबूत आणि सक्षम पक्ष म्हणून उभा राहिला आहे, असे सूचक विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, हे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे निर्देशित असल्याची…
-

मराठी रंगभूमीवर शोककळा : ‘वस्त्रहरण’चे लेखक गंगाराम गवाणकर यांचे निधन
•
मराठी रंगभूमीला मोठा धक्का बसला आहे. सुप्रसिद्ध नाटककार आणि ‘वस्त्रहरण’ या गाजलेल्या नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी सोमवारी (२७ ऑक्टोबर) रात्री १० वाजून ४० मिनिटांनी निधन झाले. मागील काही महिन्यांपासून ते आजारी होते. दहिसर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोकणातून आलेले गवाणकर हे…
