Category: News and Updates

  • मुंबईत अणुबॉम्ब कटाचा पर्दाफाश? बनावट शास्त्रज्ञाकडून १४ संवेदनशील नकाशे जप्त

    मुंबईत अणुबॉम्ब कटाचा पर्दाफाश? बनावट शास्त्रज्ञाकडून १४ संवेदनशील नकाशे जप्त

    मुंबईत राष्ट्रीय सुरक्षेला हादरा देणारी घटना समोर आली आहे. भाभा अणु संशोधन केंद्राचा (BARC) बनावट शास्त्रज्ञ असल्याचे भासवणाऱ्या अख्तर हुसेन कुतुबुद्दीन अहमद या इसमाला मुंबई गुन्हे शाखेने राष्ट्रीय तपास संस्था (NIA) आणि गुप्तचर विभाग (IB) यांच्या संयुक्त कारवाईत अटक केली आहे. त्याच्या निवासस्थानावर छापा टाकल्यावर तपास अधिकाऱ्यांना थेट ‘अणुबॉम्ब डिझाइन’शी…

  • काँग्रेसचा ठाकरेंपासून दुरावा; मुंबईच्या राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल

    काँग्रेसचा ठाकरेंपासून दुरावा; मुंबईच्या राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल

    मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे महाविकास आघाडीत (मविआ) अंतर्गत कलह उफाळला आहे. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे की, “काँग्रेस ना उद्धव ठाकरेंसोबत, ना राज ठाकरेंसोबत लढणार.” या विधानामुळे काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्यातील मतभेद आता उघड…

  • जपानच्या पहिली महिला पंतप्रधान; सनाए ताकाइचींची ऐतिहासिक निवड

    जपानच्या पहिली महिला पंतप्रधान; सनाए ताकाइचींची ऐतिहासिक निवड

    टोकियो | जपानच्या इतिहासात प्रथमच एका महिलेला देशाच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी मिळाली आहे. सनाए ताकाइची यांनी मंगळवारी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्या ‘चायना हॉक’ आणि सामाजिकदृष्ट्या परंपरावादी नेत्या म्हणून ओळखल्या जातात. ताकाइची या लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीच्या (LDP) नेत्या असून त्यांनी जपान इनोव्हेशन पार्टी (JIP) सोबत आघाडी करत अल्पमतातील सरकार स्थापन केले. गेल्या…

  • टाटा ट्रस्टमध्ये वेणु श्रीनिवासन पुन्हा आजीवन ट्रस्टी; मिस्त्रींच्या पुनर्नियुक्तीवर सर्वांचे लक्ष

    टाटा ट्रस्टमध्ये वेणु श्रीनिवासन पुन्हा आजीवन ट्रस्टी; मिस्त्रींच्या पुनर्नियुक्तीवर सर्वांचे लक्ष

    जमशेदपूर : टाटा समूहाच्या मुख्य नियंत्रण यंत्रणा असलेल्या टाटा ट्रस्ट्सने वेणु श्रीनिवासन यांची पुन्हा एकदा आजीवन ट्रस्टी म्हणून सर्वानुमते नियुक्ती केली आहे. त्यांचा कार्यकाळ 23 ऑक्टोबर रोजी संपत असताना हा निर्णय घेण्यात आला असून, संस्थेतील गटबाजी थोपवण्याचा प्रयत्न म्हणून या हालचालीकडे पाहिले जात आहे. टाटा ट्रस्ट्स सध्या दोन गटांमध्ये विभागले…

  • ”जग संकटात असताना भारत स्थैर्याचे प्रतीक” : पंतप्रधान नरेंद्र मोदी

    ”जग संकटात असताना भारत स्थैर्याचे प्रतीक” : पंतप्रधान नरेंद्र मोदी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा देताना भारताच्या जागतिक भूमिकेवर प्रकाश टाकला आहे. “जग विविध संकटांनी ग्रस्त असताना भारत स्थैर्याचे प्रतीक म्हणून उदयास आला आहे,” असे सांगत त्यांनी देशातील नागरिकांना स्वदेशीचा स्वीकार आणि आत्मनिर्भरतेचा संकल्प करण्याचे आवाहन केले. दिवाळीच्या शुभसंदेशात पंतप्रधान मोदी म्हणाले की, “ऊर्जा आणि…

  • उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी रुग्णवाहिका राखीव; विलंबामुळे महिलेचा मृत्यू, संतापजनक घटना

    उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी रुग्णवाहिका राखीव; विलंबामुळे महिलेचा मृत्यू, संतापजनक घटना

    अंबरनाथ | हृदयविकाराचा झटका आल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका महिलेला दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यासाठी रुग्णवाहिका न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी अंबरनाथ येथे घडली. विशेष म्हणजे, संबंधित रुग्णालयाची रुग्णवाहिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय कार्यक्रमासाठी राखीव ठेवण्यात आली होती, अशी माहिती स्थानिक सूत्रांनी दिली आहे. ६० वर्षीय…

  • 28 पानी सुसाइड नोट लिहून अभियंत्याची आत्महत्या; ओलाच्या सीईओवर गंभीर आरोप

    28 पानी सुसाइड नोट लिहून अभियंत्याची आत्महत्या; ओलाच्या सीईओवर गंभीर आरोप

    बंगळुरूमध्ये ओला इलेक्ट्रिक (ओला इलेक्ट्रिक) कंपनीतील एका अभियंत्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या कर्मचाऱ्याने लिहिलेल्या तब्बल 28 पानी सुसाइड नोटने संपूर्ण ओला व्यवस्थापन हादरले आहे. या पत्रात कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अग्रवाल, तसेच वरिष्ठ अधिकारी सुब्रत कुमार दास आणि इतरांवर मानसिक छळ,…

  • डाचकुल पाडा परिसरात तणाव; मुलीच्या छेडछाडीनंतर दोन गटांमध्ये झटापट, 25 रिक्षांची तोडफोड

    डाचकुल पाडा परिसरात तणाव; मुलीच्या छेडछाडीनंतर दोन गटांमध्ये झटापट, 25 रिक्षांची तोडफोड

    काशीमिरा │ काशीमिरा परिसरातील डाचकुल पाडा येथे मुलीच्या छेडछाडीच्या प्रकारानंतर दोन गटांमध्ये झालेल्या झटापटीने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. सोमवारी रात्री झालेल्या किरकोळ वादानंतर मंगळवारी सकाळी काही अज्ञात व्यक्तींनी हातात दांडके, लोखंडी सळ्या आणि दगड घेऊन परिसरात दहशत माजवली. त्यांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या २५ पेक्षा जास्त रिक्षांच्या काचा फोडून…

  • पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा! पुढील पाच दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

    पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा! पुढील पाच दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

    देशभरातून नैऋत्य मोसमी पावसाने माघार घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाले आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाल्याने महाराष्ट्रात पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यांसह पावसाचे इशारे हवामान खात्याने दिले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 21 ऑक्टोबरपासून 25 ऑक्टोबरपर्यंत कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना…

  • देशात वाढणार वैद्यकीय शिक्षणाच्या संधी; १०,६५० नव्या एमबीबीएस जागांना मंजुरी

    देशात वाढणार वैद्यकीय शिक्षणाच्या संधी; १०,६५० नव्या एमबीबीएस जागांना मंजुरी

    नवी दिल्ली : देशात वैद्यकीय शिक्षणाच्या संधींमध्ये मोठी वाढ होणार आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी तब्बल १०,६५० नवीन एमबीबीएस जागांना मंजुरी दिली आहे. यासोबतच ४६ नव्या वैद्यकीय महाविद्यालयांना देखील परवानगी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिन २०२४ रोजी देशभरात ७५,००० वैद्यकीय जागा निर्माण करण्याचे…