Category: News and Updates
-

विधानभवनातील मारहाण प्रकरण तपासाला उच्च न्यायालयाची स्थगिती
•
मुंबई : जुलै महिन्यात विधानभवनाच्या आवारात भाजप आणि शरद पवार राष्ट्रवादी गटातील कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या मारहाणीच्या प्रकरणाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने बुधवारी मरीन लाइन्स पोलिसांना पुढील तपास थांबविण्याचे आदेश दिले. १७ जुलै रोजी घडलेल्या या घटनेत शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक नितीन देशमुख…
-

“जयंत पाटील भाजपात आले तरी पडळकरचं त्यांना सिनियर” : चंद्रकांत पाटील
•
सांगली : सांगली जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा चांगलेच तापले आहे. भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, “जयंत पाटील भाजपमध्ये आले तरी गोपीचंद पडळकरच सांगलीत सीनियर ठरतील आणि जयंत पाटील ज्युनियर म्हणून मागेच राहतील.” सभेत…
-

मुंबईचा पुरातन वारसा ‘अलोकीक मुंबईचे ७५ वास्तुरत्न’ पुस्तकात
•
मुंबई : मुंबईच्या ऐतिहासिक वारशाचा ठेवा आता पुस्तकाच्या रूपाने सर्वांसमोर आला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या स्थापनेला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या औचित्याने ‘अलोकीक मुंबईचे ७५ वास्तुरत्न’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून मुंबईतील भव्य इमारती, वास्तू आणि वारसा स्थळांचा समृद्ध इतिहास जतन करण्यात आला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी…
-

मतदार याद्या होणार त्रुटीमुक्त; मृत व्यक्तींची नावे हटवली जाणार : मुख्य निवडणूक आयुक्त
•
नवी दिल्ली : देशभरातील मतदार याद्या अचूक व त्रुटीमुक्त करण्यासाठी निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. लवकरच सुरू होणाऱ्या विशेष पुनरावलोकन मोहिमेत (एसएसआर) जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा थेट निवडणूक यंत्रणेशी जोडला जाणार असून त्यामुळे मृत व्यक्तींची नावे मतदार याद्यांतून आपोआप हटवली जातील. निवडणूक आयोगाचे मत आहे की, अनेक वर्षांपासून लाखो…
-

जेन-झी हिंसाचार चिंताजनक, श्रीमंत-गरीब दरीही धोकादायक : सरसंघचालक मोहन भागवत
•
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जेन-झी पिढीत वाढत चाललेल्या हिंसक प्रवृत्तीबाबत चिंता व्यक्त केली आहे. नागपुरात झालेल्या संघाच्या शताब्दी सोहळ्यात ते बोलत होते. जगभरातील अनेक देशांमध्ये या पिढीच्या सहभागामुळे हिंसाचाराच्या घटना वाढत असून, लोकशाहीच्या स्थैर्याला धोका निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. भागवत म्हणाले की, अनेक…
-

शेतकऱ्यांना मिळणार दुष्काळाच्या सवलती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
•
मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिके, घरे, शेतीची जमीन खरडून गेल्याने शेतकऱ्यांपुढे जगण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि विरोधकांकडून राज्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी होत होती. आज (३० सप्टेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळ…
-

ऑरिक सिटीत आणखी ५० हजार कोटींची गुंतवणूक; उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा
•
छत्रपती संभाजीनगर – दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर अंतर्गत विकसित झालेल्या ऑरिक सिटीत आणखी ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याची घोषणा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. सोमवार (२९ सप्टेंबर) रोजी शेंद्रा येथील ऑरिक टाउनहॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली. सामंत यांनी सांगितले की, महाराष्ट्र हा देशातील सर्वाधिक औद्योगिक…
-

26/11 नंतर पाकिस्तानवर कारवाई अमेरिकेच्या दबावामुळे रोखली – पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट
•
26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध लष्करी कारवाई करण्याचा विचार झाला होता, मात्र अमेरिकेच्या दबावामुळे ती योजना रद्द करण्यात आली, असा मोठा गौप्यस्फोट माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी केला आहे. एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, त्या काळात यूपीए सरकारमधील काही मंत्री आणि परराष्ट्र मंत्रालयाने राजनैतिक मार्गावर भर दिल्यामुळे…
-

“अभिजात मराठी, अभिमान मराठी” – जपानमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सन्मान सोहळा भव्य उत्साहात पार
•
मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर पहिल्यांदाच जपानमध्ये 23 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेला “अभिजात मराठी, अभिमान मराठी” हा आंतरराष्ट्रीय सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग आणि आंतरराष्ट्रीय मराठी मंच, जपान यांच्या संयुक्त विद्यमाने टोकियोतील इंडिया इंटरनॅशनल स्कूल इन जपान येथे हा ऐतिहासिक…
-

पूरग्रस्तांना तातडीचा दिलासा: महाराष्ट्र सरकारनं जिल्हा निधी तत्काळ वापरास परवानगी दिली
•
पूरग्रस्त भागातील जनजीवन लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारनं जिल्हानिहाय विकास योजनांसाठी राखीव असलेल्या निधीचा वापर तात्काळ मदत व पुनर्वसनासाठी करण्यास परवानगी दिली आहे. सोमवारी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, जिल्हा नियोजन आणि विकास समितीचा (DPDC) निधी आता पूरानंतरच्या मदतकार्यासाठी वापरता येणार आहे. याआधी हा…
