Category: News and Updates
-

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगूल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
•
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगूल अखेर वाजले असून, मुंबईसह सर्व प्रलंबित महापालिकांच्या निवडणुकांची आज घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद बोलावली असून, या परिषदेत महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिका, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड,…
-

तिरुवनंतपुरम महापालिका निवडणूक २०२५: भाजपप्रणीत एनडीएचा ऐतिहासिक विजय
•
तिरुवनंतपुरम : केरळच्या राजधानीतील तिरुवनंतपुरम महापालिकेच्या २०२५ मधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) मोठा विजय मिळवत १०१ पैकी ५० प्रभाग जिंकले आहेत. या निकालामुळे सत्ताधारी डाव्या लोकशाही आघाडी (एलडीएफ) आणि काँग्रेसप्रणीत संयुक्त लोकशाही आघाडीला (युडिएफ) मोठा धक्का बसला आहे. केरळ राज्य निवडणूक आयोगाने (एसईसी) ही अधिकृत…
-

मांजरसुंबा घाटात डिझेल टँकरला भीषण आग; महामार्गावर दोन तास वाहतूक ठप्प
•
बीड : सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील मांजरसुंबा घाटात शुक्रवारी दुपारी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. डिझेलने भरलेल्या एका टँकरला पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिल्याने टँकर पलटी झाला. अपघातानंतर काही क्षणातच टँकरला भीषण आग लागली. टँकरमध्ये मोठ्या प्रमाणात डिझेल असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले आणि…
-

न्यायाधीशांसमोर संतोष देशमुखांवरील अमानुष मारहाणीचे व्हिडीओ सादर, पत्नी व भावाला अश्रू अनावर
•
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांनी संतोष देशमुख यांची कशा पद्धतीने निर्घृण हत्या केली, याचे थरकाप उडवणारे पुरावे न्यायालयासमोर सादर केले. सरकारी वकिलांनी न्यायाधीशांसमोर संतोष देशमुख…
-

देवडी येथे अ.भा.पत्रकार परिषदेचा सोहळा; वरिष्ठ पत्रकार आणि राज्यभरातील सदस्यांची असणार उपस्थिती
•
बीड : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची विस्तारित कार्यकारिणी बैठक, ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार आणि स्वातंत्र्यसैनिक माणिकराव देशमुख यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे वितरण असा भव्य कार्यक्रम रविवार, २४ डिसेंबर २०२५ रोजी बीड जिल्ह्यातील देवडी येथील माणिकबागेत आयोजित करण्यात आला आहे. ही माहिती परिषद पदाधिकारी एस. एम. देशमुख यांनी दिली. या…
-

देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे 91 व्या वर्षी निधन
•
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे आज वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. लातूरच्या राजकारणातील एक प्रभावी व केंद्रस्थानी असलेले नेते म्हणून त्यांची ओळख होती. स्थानिक ते केंद्र अशा व्यापक पातळीवर त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळत भारतीय राजकारणावर मोठी छाप उमटवली. चाकूरकर दिल्लीहून आपल्या परिवारातील विवाह…
-

राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची स्थिती स्पष्ट
•
राज्यात नगर परिषद आणि नगर पालिका निवडणुका पार पडल्यावर आता महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुका “मिनी विधानसभा” ठरणार असल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. राज्यातील २९ महापालिका आणि १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी प्राथमिक हालचाली सुरू झाल्या असून, उर्वरित जिल्हा परिषदांच्या…
-

लातूर–मुंबई प्रवासात क्रांती! फडणवीसांची मोठी घोषणा : प्रवास वेळ थेट ११ तासांवरून ५ तासांवर
•
मराठवाड्याच्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. लातूरहून मुंबईला रस्तेमार्गे जाण्यासाठी लागणारा तब्बल ११ तासांचा प्रवास आता फक्त ४.५ ते ५ तासांत होणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ‘NDTV मराठी’च्या अनस्टॉपेबल महाराष्ट्र कार्यक्रमात त्यांनी शक्तिपीठ महामार्ग आणि राज्यातील सुरू असलेल्या इतर महत्वाच्या रस्ते प्रकल्पांमुळे हा बदल…
-

गोवा नाईटक्लब दुर्घटनेला मोठे वळण: पळून गेलेले लुथरा बंधू थायलंडमध्ये पकडले
•
गोव्यातील बर्च नाईटक्लबला ६ डिसेंबर रोजी लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सुरू असलेल्या तपासाला मोठे वळण मिळाले आहे. आगीच्या पाचव्या दिवशी क्लबचे सहमालक सौरभ आणि गौरव लुथरा यांना थायलंडमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. थायलंड पोलिसांनी हातकड्यांसह आणि त्यांच्या पासपोर्टसह दोघांचे फोटो जाहीर केले आहेत. आगीची घटना घडत असताना…
-

राज्यात थंडीची लाट तीव्र; अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात घसरला
•
राज्यातील मोठ्या भागात पारा झपाट्याने घसरत असून विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र याठिकाणी थंडीची लाट अधिक तीव्र झाली आहे. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या माहितीनुसार पुढील दोन ते तीन दिवस थंडीचा जोर कायम राहणार असून किमान तापमान आणखी २ ते ३ अंशांनी घसरण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर तापमानात पुन्हा २ ते…
