Category: News and Updates
-

आमदार-खासदार आले की अधिकाऱ्यांनी ‘उठून अभिवादन’ करणे अनिवार्य, सरकारची नवीन नियमावली
•
महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व सरकारी अधिकाऱ्यांसाठी नवीन शिष्टाचार नियमावली (जीआर) जारी केली आहे. यात आमदार आणि खासदार शासकीय कार्यालयात आल्यास अधिकाऱ्यांनी आपल्या आसनावरून उठून त्यांचे अभिवादन करावे, नम्र आणि आदरपूर्ण भाषा वापरावी, आणि त्यांच्याकडून आलेल्या पत्रांना निश्चित मुदतीत उत्तर द्यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व विभागांना पाठवलेल्या या जीआर…
-

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीत मोठा घोळ; १२६१ नावे गायब
•
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीत गंभीर अनियमितता उघड झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रभाग क्रमांक १२ मधील तब्बल १२६१ मतदारांची संपूर्ण यादीच गायब झाली असून, ही नावे चुकीने प्रभाग १ मध्ये टाकल्याचे समोर आले आहे. या गायब यादीत राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक पंकज भालेकर यांचे स्वतःचे…
-

वर्ध्यात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात प्रेक्षकांचा राडा; खुर्च्या हवेत भिरकावल्या
•
वर्ध्यात आयोजित नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या लावणीच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ उसळल्याची घटना समोर आली आहे. कार्यक्रम सुरू असताना मागील रांगेतील प्रेक्षकांना मंचावरील कलाविष्कार स्पष्ट दिसत नसल्याने त्यांनी आयोजकांना जाब विचारण्यास सुरुवात केली. याच दरम्यान काही युवकांनी जोरदार शिट्ट्या, ओरड-आरडा करत धुडगूस घालायला सुरुवात केली आणि परिस्थिती चिघळत गेली. दिसण्याच्या अडचणीवरून…
-

‘भाजपच्या ऑपरेशन लोटसमध्ये शिंदे गटाचे 35 आमदार फुटणार’; ‘सामना’तून खळबळजनक दावा
•
ठाकरे गटाच्या मुखपत्र ‘दैनिक सामना’तून शनिवारी प्रकाशित झालेल्या अग्रलेखाने राज्यातील सत्ता समीकरणात नवी खळबळ उडवली आहे. लेखात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तीव्र टीका करताना भाजप–शिंदे गटातील वाढत्या नाराजीचा मुद्दा ठळकपणे मांडला आहे. ‘शिंदेंनी जे पेरले तेच आता उगवत आहे’ या शीर्षकातून भाजप ‘ऑपरेशन लोटस’च्या नव्या आवृत्तीने शिंदे गटातील किमान 35…
-

राज्यातील निवडणूक रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराची जोरदार लगबग; काँग्रेसला अमरावतीत मोठा धक्का
•
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून आगामी दोन डिसेंबर रोजी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्यानंतर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे, तर महापालिका निवडणुकाही लवकरच होणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरणात पक्षांतरांच्या हालचालींना मोठा वेग आला…
-

दोंडाईचा नगरपरिषद राज्यातील पहिली पूर्ण बिनविरोध; भाजपचे सर्व २६ नगरसेवक आणि नगराध्यक्ष बिनविरोध
•
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपरिषद निवडणुकीत अभुतपूर्व असा निकाल लागला आहे. राज्यातील विविध ठिकाणी भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून येत असतानाच दोंडाईचाने एक पाऊल पुढे टाकत संपूर्ण २६ जागांवर आणि नगराध्यक्ष पदावर भाजपची बिनविरोध निवड निश्चित केली आहे. या निमित्ताने दोंडाईचा ही राज्यातील पहिली पूर्ण बिनविरोध नगरपरिषद ठरली आहे. दोंडाईचा नगरपरिषद स्थापनेनंतर…
-

नाशिकमध्ये झाडतोडीला सयाजी शिंदेंचा जोरदार विरोध; “१०० जणांचं बलिदान देऊ पण एकही झाड तोडू देणार नाही”
•
नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारीच्या नावाखाली सुरू असलेल्या संभाव्य झाडतोडीच्या हालचालींवर ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी कडाडून टीका केली आहे. पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनासाठी नेहमीच पुढाकार घेणारे शिंदे यांनी यावेळी अत्यंत कठोर शब्दांत शासनावर नाराजी व्यक्त केली. “१०० जणांचं बलिदान देऊ, पण नाशिकमध्ये एकही झाड तोडू देणार नाही,” असा इशारा त्यांनी…
-

मराठा उद्योजक लॉबी तर्फे “माणुसकीचा मेघदूत” पुरस्काराने राज देशमुख सन्मानित
•
मराठा उद्योजक लॉबीच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा “माणुसकीचा मेघदूत” पुरस्कार २०२४ या वर्षी सामाजिक कार्यकर्ता आणि चांगुलपणाची चळवळचे अध्यक्ष तसेच WE चे सह–संस्थापक श्री. राज देशमुख यांना जाहीर करण्यात आला आहे. समाजकारणात निस्वार्थीपणे कार्य करताना मानवतेचे मूल्यं जपणाऱ्या आणि सकारात्मक बदल घडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा…
-

गोव्यातील जागतिक मराठी संमेलनाचे उद्घाटन ९ जाने. रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार
•
पणजी (गोवा) येथे ९ ते ११ जानेवारी २०२६ दरम्यान जागतिक मराठी अकादमी आयोजित ‘शोध मराठी मनाचा’ या भव्य जागतिक संमेलनाचे उद्घाटन दि. ९ जानेवारी रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न होईल. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून, ‘पद्मविभूषण’ डॉ. अनिल काकोडकर हे संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविणार…
-

उद्धव ठाकरेंचा शिंदे–भाजप तणावावर घणाघात; “बाबा मला मारतो म्हणून दिल्लीत गेले”
•
राज्यात सध्या सत्ताधारी महायुतीत सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाने तणाव तीव्र झाला आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यातील संघर्ष चिघळत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान शिंदेंनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची थेट तक्रार केल्याची चर्चा रंगली आहे. या…
