Category: News and Updates
-

ओबीसी क्रिमीलेअर उत्पन्न मर्यादेचा दर ३ वर्षांनी आढावा घेण्याची शिफारस
•
नवी दिल्ली : इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) कल्याणासाठी नेमलेल्या एका संसदीय समितीने क्रिमीलेअर उत्पन्न मर्यादेचे पुनरावलोकन दर ३ वर्षांनी करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. समितीने नुकत्याच संसदेत सादर केलेल्या आढावा अहवालात, सध्याची उत्पन्न मर्यादा अनेक कुटुंबांना आरक्षण आणि कल्याणकारी योजनांपासून वंचित ठेवत असल्याचे म्हटले आहे. भाजप खासदार गणेश सिंह यांच्या अध्यक्षतेखालील…
-

मंत्री सरनाईकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, कारवाईनंतर रॅपिडोलाच स्पॉन्सरशिप
•
ठाणे: राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या एका कृतीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. विधिमंडळ अधिवेशनादरम्यान बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या रॅपिडो बाईक टॅक्सीवर कारवाईचे आदेश देणारे सरनाईक, महिनाभरातच त्यांच्या मुलाच्या ‘प्रो गोविंद’ कार्यक्रमासाठी रॅपिडोला प्रमुख प्रायोजक म्हणून स्वीकारल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरनाईकांनी स्वतः तीन वर्षांपासून ‘प्रो गोविंद’चे रॅपिडो प्रायोजक असल्याचे…
-

रागाच्या भरात गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांना अश्रू अनावर
•
बीड: शिक्षणाचा कंटाळा आणि घरच्यांच्या तगाद्याला कंटाळून, २०१७ साली रागाच्या भरात घर सोडून गेलेला मुलगा तब्बल आठ वर्षांनंतर परतल्याने आई-वडिलांच्या डोळ्यांतून आनंदाश्रूंचा महापूर वाहिला. पोलिसांनी या मुलाला शोधून काढून ‘सरप्राईज गिफ्ट’ म्हणून त्याच्या आई-वडिलांसमोर आणले आणि ‘फिल्मी स्टाईल’ भेटीने सर्वांनाच भावूक केले. राजू काळेसाहेब माळी (वय २४, रा. खडकूट, ता.…
-

पेन्शनच्या हक्कासाठी सावत्र आईही ‘आई’च: सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
•
नवी दिल्ली: ‘आई’ या शब्दाचा अर्थ अधिक व्यापक करण्याची गरज असून, सामाजिक कल्याण योजना आणि पेन्शनमध्ये सावत्र आईचाही समावेश केला पाहिजे, असे महत्त्वपूर्ण मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. केंद्र सरकार आणि भारतीय हवाई दलाला आवाहन करत न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत, उज्ज्वल भुयान आणि एन. कोतिस्वर सिंग यांच्या…
-

वांद्रे येथे उच्च न्यायालयाचे भव्य संकुल उभारणीचा मार्ग मोकळा; सरकारने आरक्षण हटविले
•
मुंबई: वांद्रे (पूर्व) येथील शासकीय कर्मचारी वसाहतीच्या जागेवर उच्च न्यायालयाचे भव्य संकुल उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. राज्य सरकारने या जागेवरील विविध आरक्षणे रद्द करण्यासाठी मंत्रालयीन अधिसूचना जारी केली आहे. हे संकुल सुमारे ३० एकर जमिनीवर उभारले जाणार असून, यासाठी पूर्वी अस्तित्वात असलेली कर्मचारी वसाहत, क्रीडांगण, उद्यान, सांस्कृतिक केंद्र,…
-

आदिवासी महिलांसाठी ‘राणी दुर्गावती योजना’ जाहीर; १०० टक्के अनुदान मिळणार
•
मुंबई: आदिवासी महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ‘राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना’ जाहीर करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत आदिवासी महिलांना विविध व्यवसायांसाठी १०० टक्के अनुदान दिले जाणार आहे. यापूर्वी केंद्र सरकारच्या योजनांमध्ये ५० टक्के हिस्सा द्यावा लागत होता, परंतु आता तो…
-

जन्मापूर्वीच सौदा: सहा दिवसांच्या अर्भकाची साडेपाच लाखांत विक्री, पोलिसांनी डाव उधळला
•
मुंबईमध्ये बाळाच्या जन्मापूर्वीच सौदा, सहा दिवसांच्या अर्भकाची साडेपाच लाख रुपयांत विक्री करण्याचा डाव पोलिसांनी उधळला आहे. गोवंडी येथील शिवाजी नगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. शिवाजी नगर परिसरात लहान बालकांची विक्री होत असल्याची माहिती एका २४ वर्षीय तक्रारदाराने पोलिसांना दिली. समीर नावाचा व्यक्ती लहान मुलांची विक्री करत असल्याचे…
-

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जयंतीनिमित्त सर्व शाळांमध्ये 14 ऑगस्टरोजी पसायदान पठण
•
मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये पसायदानाचे सामूहिक पठण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, शालेय शिक्षण विभागाने येत्या १४ ऑगस्ट रोजी हा उपक्रम राबवण्याचे निर्देश दिले आहेत. या उपक्रमाचा मुख्य उद्देश ज्ञानेश्वर माऊलींच्या शिकवणीचा प्रसार करणे आहे. शालेय शिक्षण व क्रीडा…
-

भारतावर अमेरिकेने लादले ५०% टॅरिफ; रशियाकडून तेल खरेदी ठरली कारण
•
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी भारतीय वस्तूंवर २५% अतिरिक्त आयात शुल्क (टॅरिफ) लादल्याने आता अमेरिकेत भारतीय वस्तूंवर एकूण ५०% टॅरिफ लागू झाले आहे. भारताने रशियाकडून खनिज तेल खरेदी सुरूच ठेवल्यामुळे हा दंड लावण्यात आल्याचे ट्रम्प यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. हे टॅरिफ ‘अन्यायकारक, अनुचित आणि अवाजवी’ असल्याचे…
-

लग्न जुळवण्याच्या नावाखाली अडीच लाखांची फसवणूक; महिनाभर पाहुण्यासारखे राहून दाम्पत्य पसार
•
बीड: मुलांच्या लग्नासाठी मुली पाहात असलेल्या गेवराई येथील चार महिलांची एका दाम्पत्याने तब्बल अडीच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्न जुळवतो असे सांगून हे दाम्पत्य तब्बल महिनाभर पाहुण्यासारखे राहिले आणि पैशांची जुळवाजुळव होताच पोबारा केला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चारही महिलांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेत…
