Category: News and Updates
-

कबुतरांना दाणे टाकण्यावरून वाद, वृद्ध नागरिकाला मारहाण; चौघांविरोधात गुन्हा दाखल
•
मीरा रोड: कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे होणाऱ्या गंभीर आजारांमुळे मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरखान्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. असे असतानाच मीरा रोड येथे कबुतरांना दाणे टाकण्यावरून झालेल्या वादातून एका ६१ वर्षीय वृद्ध नागरिकाला मारहाण करण्यात आली. त्यांच्या मुलीचा गळा दाबून तिला लोखंडी रॉडने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.…
-

मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांना २ कोटींचा भुर्दंड; पालिका अॅक्शन मोडवर
•
मुंबई: राज्य सरकारने दुकानांवरील पाट्या मराठीत असणे सक्तीचे केले असतानाही, अनेक दुकानदार या नियमाचे पालन करत नाहीत. यामुळे मुंबई महानगरपालिकेने अशा दुकानदारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. आतापर्यंत ३,१३३ दुकानांवर कारवाई करण्यात आली असून, त्यातून तब्बल १ कोटी २९ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वारंवार सूचना देऊनही मराठी पाट्या न…
-

पत्नीला भारतात ठेवण्याच्या अटीविरोधात पतीची सर्वोच्च न्यायालयात याचिका
•
नवी दिल्ली: लग्नाचं आमिष दाखवून एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने राजस्थान उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिलं आहे. नोकरीसाठी परदेशात जायचं असल्यास, पत्नीला भारतातच ठेवण्याच्या राजस्थान उच्च न्यायालयाच्या अटीला त्याने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. या प्रकरणाची सुनावणी ८ ऑगस्ट रोजी होणार आहे. काय आहे प्रकरण? सॉफ्टवेअर…
-

समृद्धी महामार्गावर ‘१ हजार डोळे’, वेगमर्यादा ओलांडल्यास ऑनलाइन दंड
•
अमरावती: नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता ५०० किलोमीटरपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत आहेत. यामुळे वेगमर्यादेचे उल्लंघन झाल्यास चालकांना ऑनलाइन दंड आकारला जाणार आहे. अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असून, या कॅमेऱ्यांमुळे महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेत भर पडणार आहे. वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर ऑनलाइन दंड या महामार्गावर…
-

मुंबईतील ‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांवर गुन्हा दाखल
•
मुंबई: पंचशील नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात ८० कोटी रुपयांचा मोठा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने ‘आशापुरा ग्रुप’च्या सात संचालकांविरोधात टिळक नगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या घोटाळ्यामुळे हजारो नागरिकांचे घराचे स्वप्न धोक्यात आले आहे.या गुन्ह्यात चेतन भानुशाली, प्रवीण चामरिया, माया दिकमत ठान,…
-

‘महादेवी’ हत्तीण प्रकरणी मुंबईत बैठक, शासनाचा थेट आदेश नाही- मुख्यमंत्री
•
मुंबई : ‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात सरकारने कोणताही थेट आदेश दिलेला नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथे पत्रकारांशी बोलताना दिली. त्यांनी सांगितले की, नांदणी परिसरातील लोकांच्या भावना लक्षात घेऊन, या प्रकरणी मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर ‘महादेवी’ प्रकरणावर ही बैठक होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.…
-

पुणे पोलिसांकडून तरुणींचा छळ झाल्याचा आरोप: प्रकाश आंबेडकर आक्रमक
•
पुणे – पुण्याच्या कोथरूड पोलीस ठाण्यात तीन दलित तरुणींचा पोलिसांकडून छळ झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एका प्रकरणाच्या चौकशीसाठी या तरुणींना पुण्यात आणून त्यांचा छळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणावरून मोठी खळबळ उडाली आहे. काय आहे प्रकरण? छत्रपती संभाजीनगर येथील एका २३ वर्षीय विवाहित महिलेला तिच्या पतीकडून…
-

लोकमान्यांच्या स्वप्नातला भारत घडवण्यासाठी प्रयत्नशील : नितीन गडकरी
•
पुणे: लोकमान्य टिळक यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ते ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ वितरण समारंभात बोलत होते. यंदाचा पुरस्कार केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, उच्च…
-

मध्यान्ह भोजनाचा दर्जा सुधारण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय
•
पुणे : राज्यातील खासगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील इयत्ता १ली ते ८वीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजनाचा दर्जा सुधारण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या तांदळाचा दर्जा तपासण्यासाठी आता शिक्षण अधिकारी किंवा त्यांचे प्रतिनिधी पुरवठादारांच्या गोदामांवर अचानक धाडी टाकणार आहेत. या तपासणीमध्ये गोदामांमध्ये अस्वच्छता आढळल्यास…
-

पर्यावरणपूरक गणेशोत्ससाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल
•
मुंबई: पर्यावरणाची काळजी घेत गणेशोत्सव साजरे करण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पासून बनवलेल्या मूर्तींच्या पुनर्वापरासाठी सरकारने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. पीओपीच्या पुनर्वापराची प्रक्रिया आणि त्याचे धोरण निश्चित करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षतेखाली ८ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला सहा…
