Category: News and Updates
-

लग्नात सीआयएसएफच्या जवानाने 17 वर्षाच्या मुलाची गोळी मारून केली हत्या
•
पूर्व दिल्लीतील एम.एस. पार्क परिसरात लग्नसमारंभात जेवणासाठी प्रवेश केलेल्या 17 वर्षीय मुलाचा गोळी लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. पोलिसांनी रविवारी याची माहिती दिली. घटनास्थळी उपस्थित असलेला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा (CISF) हेड कॉन्स्टेबल याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता खुनाचा तसेच शस्त्रास्त्र कायद्याच्या…
-

पोलिसांच्या प्रतिमेतील बदलाची गरज अधोरेखित, पंतप्रधानांचे ‘डीजीपी परिषदेत’ आवाहन
•
रायपूर येथे रविवारी झालेल्या 60व्या अखिल भारतीय डीजीपी-आणि आयजीपी परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील पोलिस दलाच्या कामकाजाबाबत सार्वजनिक प्रतिमा बदलण्याची तातडीची गरज असल्याचे स्पष्ट केले. बदलत्या सामाजिक वातावरणात युवकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास दृढ करण्यासाठी व्यावसायिकता, संवेदनशीलता आणि तत्परता वाढवणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ‘विकसित भारत : सुरक्षा आयाम’ या विषयावर…
-

अचानक मस्साजोगला धाव घेतली; अजित पवारांची संतोष देशमुख कुटुंबाची भेट
•
संतोष देशमुख यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कोणतीही पूर्वसूचना न देता मस्साजोगकडे अचानक धाव घेतल्याने बीड जिल्ह्यातील पोलीस व प्रशासन यंत्रणेत खळबळ उडाली. माजलगाव आणि धारूर येथील सभा संपवून ते थेट हेलिपॅडकडे जाणार असल्याची अधिकृत माहिती होती. मात्र सभेनंतर त्यांनी नियोजित कार्यक्रम बदलत ताफ्यासह मस्साजोगकडे वळण्याचा…
-

दोन भावांच्या वैरातून धाराशिवचे नुकसान; सरनाईकांचा निंबाळकर–पाटील घराण्यावर हल्लाबोल
•
धाराशिव जिल्ह्यातील राजकारणात सध्या तापलेले वातावरण कायम असून, दोन प्रमुख राजकीय घराण्यांतील संघर्षामुळे जिल्ह्याचा विकास थांबल्याचा आरोप राज्याचे पालकमंत्री तथा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केला. उमरगा येथे शिवसेना उमेदवार किरण गायकवाड यांच्या प्रचारसभेत बोलताना सरनाईक यांनी खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. निवडणुकांचा प्रचार अंतिम…
-

सर्वोच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा दिलासा; गुडधेंची याचिका फेटाळली
•
नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीविरोधात दाखल करण्यात आलेल्या कॉंग्रेस नेते प्रफुल्ल गुडधे यांच्या याचिकेला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी धक्कादायक फटका दिला. गुडधे यांनी फडणवीस यांच्या निवडणुकीत मतदान यंत्रात फेरफार झाल्याचा आरोप करत निवडणूक रद्द करण्याची मागणी केली होती; मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका ग्राह्य न…
-

खासगी जमिनीवरील ‘वन’ संज्ञा हटविण्यास सर्वोच्च न्यायालयाची मान्यता; शेतकऱ्यांना मोठा दिलासा
•
ठाणे, रायगड, पुणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांतील हजारो शेतकऱ्यांना त्यांच्या खासगी जमिनीवरील ‘वन’ ही नोंद रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने दिलेली परवानगी हा ऐतिहासिक निर्णय ठरला आहे. अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना त्यांच्या मालकीच्या जमिनीवर कर्ज, विक्री, बांधकाम, व्यवसाय किंवा शेतीविकासकामांसाठी आवश्यक परवानग्या मिळू शकत नव्हत्या. वनसंलग्न नोंदीमुळे जमीन सरकारी मालकीत असल्यासारखी अडवली…
-

इम्रान खान यांच्या मृत्यूची अफवा; भेटीवर बंदी, बहिणींवर लाठीचार्ज; पाकिस्तानात खळबळ
•
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाचे संस्थापक इम्रान खान यांच्या तब्यतीबाबत गंभीर अफवा पाकिस्तानात वेगाने पसरत आहेत. आदियाला तुरुंगात (रावळपिंडी) 2023 पासून शिक्षा भोगत असलेल्या इम्रान खान यांचा तुरुंगातच मृत्यू झाल्याची चर्चा सोशल मीडियावर जोरदार आहे. पाकिस्तानी लष्कराकडून त्यांना विष दिल्याचा दावा अनेक ठिकाणी केला जात असून त्यामुळे…
-

आयआयटी मुंबई की आयआयटी बॉम्बे? केंद्रीय मंत्र्याच्या वक्तव्यानंतर राज्यात वादाला तोंड
•
मुंबई : केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी आयआयटी मुंबईच्या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे ‘मुंबई की बॉम्बे’ हा जुना वाद पुन्हा एकदा पेटला आहे. “आयआयटी बॉम्बेचे नाव आयआयटी मुंबई करण्यात आलं नाही, यासाठी देवाचे आभार मानतो,” असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रीय…
-

गौरी पालवे मृत्यू प्रकरणात सेटलमेंटच्या हालचाली? अंजली दमानियांचा गंभीर आरोप
•
वरळी येथे डॉ. गौरी पालवे यांच्या मृत्यू प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे यांनी २२ नोव्हेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्राथमिक तपास होता. मात्र गौरीच्या कुटुंबीयांनी हा मृत्यू संशयास्पद ठरवत हत्या किंवा आत्महत्येस प्रवृत्त…
-

बॉलीवूडचा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड; धर्मेंद्र यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा
•
धर्मेंद्र यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. सोमवारी सकाळी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिव देहाला विले पार्ले येथील स्मशानभूमीत अखेरची श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असून, या वेळी बच्चन कुटुंबासह अनेक दिग्गज कलाकारांनी उपस्थित राहून अंतिम निरोप दिला. धर्मेंद्र यांच्या निधनाची माहिती…
