Category: News and Updates
-

चीनमध्ये कंडोमवर ‘महाकाय’ कर; तज्ञांनी व्यक्त केली सार्वजनिक आरोग्याबाबत चिंता
•
लोकसंख्या वाढवण्यासाठी विविध उपाययोजना करत असलेल्या चीनने आता कंडोम आणि इतर गर्भनिरोधक साधनांवर पुन्हा कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल ३० वर्षांनंतर प्रथमच या उत्पादनांवर व्हॅल्यू ॲडेड टॅक्स (VAT) लागू केला जाणार आहे. सुधारित कर कायद्यानुसार कंडोमवर १३ टक्के VAT आकारला जाईल. विशेष म्हणजे १९९३ पासून ही उत्पादने करमुक्त होती.…
-

जिल्हा परिषद निवडणुका दोन टप्प्यात? आरक्षण मर्यादा ओलांडल्याने आयोगाचा विचार सुरू
•
राज्यातील जिल्हा परिषद निवडणुका दोन टप्प्यात घेण्याचा गंभीर विचार राज्य निवडणूक आयोगाकडून होत असल्याची माहिती समोर आली आहे. ५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडल्याच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयात २१ जानेवारीला सुनावणी होणार असल्याने, आरक्षण मर्यादा न ओलांडलेल्या जिल्ह्यांच्या निवडणुका आधी घेण्याचे नियोजन सुरू आहे. राज्यातील एकूण ३२ जिल्हा परिषदांपैकी तब्बल १७ ठिकाणी…
-

समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांचे ९३व्या वर्षी निधन
•
सोलापूर – प्रख्यात समाजवादी विचारवंत, राष्ट्रसेवक आणि ज्येष्ठ पत्रकार पन्नालाल सुराणा यांचे ९३ व्या वर्षी सोलापूर येथे निधन झाले. मागील काही दिवसांपासून प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मंगळवारच्या उशिरा एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. सुराणा यांनी समाजातील पीडित, शोषित आणि वंचित…
-

देवेंद्र फडणवीस–संजय राऊत अचानक भेट; आशिष शेलारही उपस्थित, राजकीय चर्चांना उधाण
•
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडवणारी घटना मंगळवारी मुंबईत घडली. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एका विवाहसोहळ्यात अनपेक्षित भेट झाली. राऊत यांचे व्याही राजेश नार्वेकर यांच्या मुलाच्या लग्नाला दोन्ही नेते उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि दोघांमध्ये जवळपास १५…
-

पत्रकारांच्या चळवळीचा वर्धापन दिन…
•
स्वातंत्र्यपूर्व काळात साहित्य, नाट्य आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात तीन महत्वाच्या संस्था स्थापन झाल्या.. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अशी त्यांची नावं.. चार – दोन वर्षांच्या फरकानं या संस्था स्थापन झाल्या.. आनंदाची गोष्ट अशी की त्या आजही आपआपल्या क्षेत्रात भरीव काम करताना…
-

‘भीमांजली’ला दहा वर्षे पूर्ण : शास्त्रीय संगीताच्या सुरांतून बाबासाहेबांना अनोखी आदरांजली
•
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६९व्या महापरिनिर्वाणदिनी, ‘राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती’ व ‘तालविहार संगीत संस्था’तर्फे दरवर्षी आयोजित केली जाणारी ‘भीमांजली’ ही शास्त्रीय संगीताद्वारे वाहिली जाणारी अभूतपूर्व आदरांजली यावर्षी दहाव्या वर्षात पदार्पण करत आहे. ६ डिसेंबर रोजी श्री रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, दादर येथे पहाटे ६ वाजता कार्यक्रम पार पडणार…
-

२१ डिसेंबरला राज्यातील सर्व नगरपालिकांची मतमोजणी करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
•
राज्यातील नगर पालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागपूर खंडपीठाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. न्यायालयाने राज्यातील सर्व नगरपालिका निवडणुकांची मतमोजणी एकाच दिवशी – 21 डिसेंबर 2024 रोजी – घेण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने स्पष्ट केले की, त्या दिवसापर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे. दरम्यान, आज २ डिसेंबर रोजी राज्यातील अनेक नगरपालिकांमध्ये मतदान होत आहे.…
-

११ हजार रुपये पगार घेणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याने, कसा काढला १११ कोटी रुपयांचा चेक ?
•
सरकारी कर्मचारी काहीही करू शकतो, याचे उदाहरण पाहायचे असेल तर महाराष्ट्रातील कोणत्याही सरकारी कार्यालयात जा, तिथे काम न करण्याचा पगार घेणारे लोक, तुम्हाला पदोपदी भेटतील. पण जेव्हा तुम्ही त्यांना नोटांचा खुराक द्याल तेव्हा ते, अशक्य ते काम सुद्धा करून देतील… आदिवासी बहुल मागासलेल्या जव्हारमध्ये काही दिवसांपूर्वी तेच घडले, दिवस ढवळ्या…
-

महाराष्ट्रात सायबरबुलिंग व सेक्स्टॉर्शनमध्ये वाढ; इंटरनेट वापर वाढला, जागरूकता कमी
•
महाराष्ट्रात सायबरबुलिंग आणि सेक्स्टॉर्शनचे प्रमाण झपाट्याने वाढत असून राज्य सायबर सेलने याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. इंटरनेटचा वाढता वापर, बनावट खात्यांमधून होणारी गुप्तता आणि सर्वसामान्यांमधील डिजिटल जागरूकतेचा अभाव हे या वाढीमागील प्रमुख कारण असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. राज्य सायबर सेलच्या आकडेवारीनुसार, २०२२ ते २०२४ या काळात सेक्स्टॉर्शनच्या घटनांमध्ये सातत्याने…
-

मतदानाच्या काही तास आधी निवडणूक रद्द; मुख्यमंत्री फडणवीसांचा संताप
•
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतदानाच्या काही तास आधीच राज्य निवडणूक आयोगाने पुढे ढकलल्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आयोगाच्या निर्णयाला “कायद्याचा चुकीचा अर्थ लावणारा आणि प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय करणारा” असा ठपका ठेवला.…
