Category: News and Updates
-

गोव्यातील जागतिक मराठी संमेलनाचे उद्घाटन ९ जाने. रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार
•
पणजी (गोवा) येथे ९ ते ११ जानेवारी २०२६ दरम्यान जागतिक मराठी अकादमी आयोजित ‘शोध मराठी मनाचा’ या भव्य जागतिक संमेलनाचे उद्घाटन दि. ९ जानेवारी रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न होईल. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून, ‘पद्मविभूषण’ डॉ. अनिल काकोडकर हे संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविणार…
-

उद्धव ठाकरेंचा शिंदे–भाजप तणावावर घणाघात; “बाबा मला मारतो म्हणून दिल्लीत गेले”
•
राज्यात सध्या सत्ताधारी महायुतीत सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाने तणाव तीव्र झाला आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यातील संघर्ष चिघळत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान शिंदेंनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची थेट तक्रार केल्याची चर्चा रंगली आहे. या…
-

पुणे जमीन घोटाळा : ‘राजेंद्र मुठे समितीच अस्तित्वातच नाही’, महसूलमंत्र्यांचा गौप्यस्फोट
•
पुण्यातील कोरेगाव पार्क येथील शासकीय जमिनीवरील कथित घोटाळ्याला नवा वळण मिळाले आहे. पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया’ कंपनीशी संबंधित प्रकरणात दोन दिवसांपूर्वी समोर आलेल्या राजेंद्र मुठे समिती अहवालाला महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी सरळ नाकारले आहे. “राजेंद्र मुठे नावाची कोणतीही समिती सरकारने स्थापन केलेली नव्हती. त्यामुळे त्यांच्या नावाने फिरत असलेला अहवाल…
-

कर्नाटक काँग्रेसमध्ये नेतृत्वबदलाची चर्चेला उधाण; डी.के. शिवकुमारांच्या वक्तव्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले
•
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी लवकरच प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचे संकेत दिल्याने कर्नाटकातील काँग्रेसमधील नेतृत्वबदलाची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे. बंगळुरू येथे इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते म्हणाले, “मी या पदावर कायम राहू शकत नाही. साडेपाच वर्षे झाली आहेत… आता इतर नेत्यांनाही संधी दिली पाहिजे.”…
-

राज्यपालांच्या अधिकारांवरील डेडलाईन हटली; विलंब करू नयेत, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
•
सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय संविधान पीठाने आज महत्त्वपूर्ण निर्णय देत राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्या विधेयकांवरील निर्णय प्रक्रियेवर वेळेची बंधने घालता येणार नाहीत, असे स्पष्ट केले. राज्य विधानसभांनी मंजूर केलेल्या विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी कोणतीही कायदेशीर वेळ-सीमा निश्चित करता येणार नाही, मात्र अनावश्यक किंवा अनिश्चित विलंब झाल्यास न्यायालय हस्तक्षेप करू शकते, असे…
-

ऐश्वर्या राय बच्चनचा मानवतेचा संदेश; सत्य साईबाबा शताब्दी सोहळ्यात पंतप्रधान मोदींसमोर केलं भाषण
•
दिवंगत आध्यात्मिक गुरु सत्य साईबाबा यांच्या शताब्दी उत्सवातील भव्य कार्यक्रमात अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची उपस्थिती विशेष ठरली. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात ऐश्वर्याने दिलेला मानवतेचा संदेश आणि तिच्या आदरयुक्त वर्तनाने उपस्थितांची मनं जिंकली. मंचावर आल्यानंतर ऐश्वर्याने सर्वप्रथम पंतप्रधान मोदींच्या पायांना स्पर्श करून आदर व्यक्त केला. पीएम…
-

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावर राणाजगजितसिंह पाटील यांचे सुप्रिया सुळे यांना खुले पत्र
•
तुळजापूर येथे सुरू असलेल्या ड्रग्ज प्रकरणासंदर्भात तसेच मुंबईतील शताब्दी रुग्णालयाच्या निविदेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी केलेल्या आरोपांना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी खुल्या पत्राद्वारे प्रत्युत्तर दिले आहे. या पत्रात त्यांनी सुळे यांच्याशी असलेल्या वैयक्तिक नातेसंबंधांचा उल्लेख करत, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या विषयी केल्या जाणाऱ्या विधानांबद्दल नाराजी…
-

अनगर नगराध्यक्षा निवडणूक वादात उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद; बिनविरोध निवडणुकीवरून राजकारण तापलं
•
अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीने तीव्र राजकीय वाद निर्माण झाला असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेत्या उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज १८ नोव्हेंबर रोजी तहसील प्रशासनाने बाद ठरवला. या निर्णयानंतर थिटे यांनी तो निर्णय न्यायालयात आव्हान देण्याची भूमिका घेतली असून, “अर्ज कसा बाद झाला याची चौकशी मागवणार,” असे त्यांनी स्पष्ट…
-

नवी मुंबई विमानतळात 25 डिसेंबरपासून प्रवासी उड्डाणांना सुरुवात; सुरुवातीला फक्त 12 तास सेवा
•
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) प्रवासी सेवेसाठी सज्ज झाला असून, येत्या 25 डिसेंबरपासून नियमित उड्डाणांना प्रारंभ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबरला या प्रकल्पाचे लोकार्पण झाले होते. आता पहिल्या टप्प्यात विमानतळ मर्यादित कालावधीत म्हणजे सकाळी ८ ते रात्री ८ या १२ तासांपर्यंतच कार्यरत राहणार आहे. या कालावधीत…
-

वाघ संवर्धनासाठी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; कोअर क्षेत्रात सफारी बंद, नाईट टुरिझमला पूर्ण बंदी
•
नवी दिल्ली : वाघ संवर्धनातील वाढत्या उल्लंघनांवर अंकुश ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी महत्त्वाचा निर्णय दिला आहे. देशातील सर्व वाघ राखीव क्षेत्रांसाठी लागू होणाऱ्या या आदेशात कोअर किंवा अत्यावश्यक अधिवास क्षेत्रात कोणत्याही प्रकारची वाघ सफारी परवानगीयोग्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सफारी केवळ नॉन-फॉरेस्ट किंवा डिग्रेडेड जमिनीवर, तसेच बफर क्षेत्रातच होऊ…
