मुंबईतील मुसळधार पावसाचा केईएमला फटका; रुग्णालयात पाणी शिरले

मुंबई : महाराष्ट्रात मे महिन्यातच पावसाने घातलेल्या धुमकुळाने मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. या पावसामुळे अनेक भागात नुकसान झालेलं पाहायला मिळत आहे. या पावसाच्या पाण्याचा फटका आता चक्क केईएम रुग्णालयाला ही बसल्याचे बघायला मिळाले आहे. मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे केईएम रुग्णालयातील तळमजल्यात पाणी साचले आहे. पावसाचे पाणी अगदी तळमजल्यापर्यंत शिरले असून रुग्णालयातील बालरोग अतिदक्षता विभाग (पीआयसीयू) पर्यंत पाण्याचा शिरकाव झाला आहे. ज्यामुळे रुग्ण आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मोठी गैरसोय झाली असून रुग्णालय प्रशासनात चिंता निर्माण झाली आहे.पुढे आलेल्या माहितीनुसार, केईएम रुगाणालयातील रेडिओलॉजी डिपार्टमेंटसमोर सध्या मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. कर्मचाऱ्यांच्या वतीने पाणी काढण्याच काम सुरू आहे. मात्र हा रुग्णालयात रुग्णांचा येण्याजाण्याचा रस्ता असल्यामुळे या भागात मोठी गर्दी देखील झाली आहे.

55 वर्षाचा विक्रम मोडला

दरम्यान, रविवारी कोकणात दाखल झालेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी सोमवारी मुंबईत प्रवेश केला. मान्सूनने मुंबईत दाखल होण्याचा 55 वर्षाचा विक्रम मोडला आहे. यापूर्वी 1956, 1962 आणि 1971 साली मान्सून 29 मे रोजी मुंबईत दाखल झाला होता. मात्र, यंदा मान्सूनने हा विक्रमही मोडीत काढला आहे. एरवी मान्सून मुंबईत 11 जूनच्या आसपास दाखल होतो. परंतु, यंदा मान्सून 16 दिवस आधीच मुंबईत धडकला आहे. मुंबईसह, पुणे आणि सोलापुरात मान्सून दाखल झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. पुढील 3 दिवसांत महाराष्ट्रातील आणखी काही भाग मान्सून व्यापणार असल्याचे माहिती हवामान विभागानं दिली आहे. मुंबईतील वरळी परिसरातील भुयारी मेट्रोच्या आचार्य अत्रे चौक स्थानकात पाणी, मेट्रो सेवा बंद, भुयारी मेट्रोकडे जाणारं गेटही बंद करण्यात आले आहे. मुंबईतील महत्त्वकांशी प्रकल्प एक्वा लाइन-3 ला पावसाचा फटका बसला आहे. मुंबईतील आचार्य अत्रे चौक वरळी मेट्रो स्थानकावर पावसाचे पाणी साचले आहे. मेट्रोमधून उतरताच प्रवाशांना तळ्यात उतरल्याचा भास होताना दिसला. मुंबईतील अंडरग्राउंड मेट्रो-3 ही नुकतीच धावू लागली. मात्र मुंबईतील पहिल्याच पावसात भुयारी मेट्रोला याचा फटका बसला आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *