-

वाढत्या तापमानाचा धोका गंभीर; जगात ७५ दिवस, भारतात ३० दिवस उन्हाळा वाढणार
•
वाढत्या जागतिक तापमानाचा इशारा आता अधिक स्पष्ट झाला असून जगभरात सरासरी ७५ दिवस आणि भारतात सुमारे ३० दिवस उन्हाळा वाढणार असल्याचा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे. हवामानबदलावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रभावी उपाययोजना न केल्यास ही स्थिती अधिक गंभीर होऊ शकते, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. वाढलेले तापमान, अनपेक्षित उष्णतेच्या लाटा आणि सतत…
-

पत्रकाराला मारहाण केल्याप्रकरणी शेकाप नेते जयंत पाटील दोषी; हर्षद कशाळकर यांना न्याय
•
अलिबागहून पत्रकारांना प्रेरणा देणारा आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वास पुन्हा दृढ करणारा निकाल समोर आला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस व माजी आमदार जयंत पाटील यांना 2019 मध्ये लोकसत्ता दैनिकाचे पत्रकार हर्षद कशाळकर यांना मतदान केंद्रात मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. घटनेच्या वेळी पाटील यांनी “तुम्ही पत्रकार काहीही छापता” असं म्हणत…
-

कोल्हापूर महिला सुधारगृहात धक्कादायक घटना; सहा नृत्यांगनांचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न
•
कोल्हापूर – कोल्हापूर शहरात एका महिला सुधारगृहात आज सकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सुधारगृहात ठेवण्यात आलेल्या सहा नृत्यांगनांनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना उघड होताच पोलिस व प्रशासन तातडीने हालचालीला लागले. प्राथमिक माहितीनुसार, या सर्व महिलांना तत्काळ उपचारासाठी सीपीआररुग्णालय कोल्हापूर येथे…
-

जैन बोर्डिंग हॉस्टेल जमीनविक्री प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांची एन्ट्री; न्यायाचं आश्वासन
•
पुणे शहरातील मोक्याच्या जागेवर असलेल्या जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या जमिनीच्या विक्री प्रकरणावरून राज्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. अनेक दशकांपासून वंचित समाजातील विद्यार्थ्यांना आसरा देणारी ही जमीन सत्ताधाऱ्यांच्या संगनमताने विकल्याचा गंभीर आरोप जैन समाजाकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जैन बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, या…
-

देशातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी सायबर फसवणूक; ५८ कोटींना गंडवले
•
मुंबई : मुंबईतील ७२ वर्षीय वृद्ध शेअर दलालाला आभासी अटक दाखवून सायबर गुन्हेगारांनी तब्बल ५८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. देशातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी ऑनलाइन फसवणूक मानली जात आहे. याआधी २० ते २३ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची नोंद होती. तक्रारदार हे दक्षिण मुंबईत राहणारे व्यावसायिक…
-

सीईटी सेलची कारवाई! सीट ब्लॉकिंग प्रकरणात १५२ विद्यार्थ्यांपैकी फक्त १ ने सादर केली मूळ कागदपत्रं
•
मुंबई : राज्यातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत मोठ्या गैरप्रकाराचा पर्दाफाश झाला आहे. CET सेलने १५२ विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी नोटिसा बजावल्या होत्या. मात्र मुदत संपल्यानंतर फक्त एका विद्यार्थ्यानेच आपली मूळ कागदपत्रं सादर केली आहेत. या घटनेमुळे प्रवेश प्रक्रियेतील “सीट ब्लॉकिंग” घोटाळ्यावर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे. राज्य सरकारच्या CET सेलने…
-

भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डीले यांचे निधन; राजकीय क्षेत्रात शोककळा
•
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झाले. पहाटे अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना नगर शहरातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झाल्याचे समजते. त्यांच्या निधनाने नगर जिल्ह्यासह राज्यभरात हळहळ व्यक्त…
-

गुजरातमध्ये सत्तेचा मोठा ‘रिबूट’; मुख्यमंत्री सोडून सर्व १६ मंत्र्यांचा राजीनामा
•
गुजरातच्या राजकारणात दिवाळीच्या अगोदरच मोठा सत्तापालट झाल्याने राज्याच्या राजकीय पटावर खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना पदावर कायम ठेवत इतर सर्व १६ मंत्र्यांनी एकत्रितपणे राजीनामा दिला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेला हा फेरबदल ही केवळ मंत्रिमंडळ बदलाची कारवाई नसून एक योजनाबद्ध राजकीय डाव असल्याचं स्पष्ट होत आहे. या हालचालीमागे…
-

डिबेंचर कपातीविरोधात शेतकऱ्यांचा गोकुळवर मोर्चा; प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक
•
गोकुळ दूध संघच्या डिबेंचर कपातीच्या निर्णयावरून दूध उत्पादक शेतकरी आणि संघटनांमध्ये संघर्ष उफाळला आहे. डिबेंचर कपातीविरोधात शेतकऱ्यांनी गुरांसह ‘जवाब दो मोर्चा’ काढत प्रशासनाविरोधात जोरदार निदर्शने केली. हा मोर्चा शासकीय विश्रामगृहापासून गोकुळच्या कार्यालयापर्यंत काढण्यात आला. शेतकऱ्यांचा आरोप आहे की, गोकुळने डिबेंचर रकमेतील सुमारे 40 टक्के कपात केली असून यामुळे त्यांच्या उत्पन्नावर…
-

बुलढाण्यात बोगस मतदार? आमदार संजय गायकवाड यांचा निवडणूक आयोगावर घणाघात
•
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात एक लाखांपेक्षा अधिक बोगस मतदारांची नावे मतदारयादीत असल्याचा गंभीर आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. मृत व्यक्ती, स्थानांतरित अधिकारी यांची नावे अद्याप मतदारयादीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, निवडणूक आयोग बोगस नावे वगळण्यास टाळाटाळ करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. गायकवाड म्हणाले, “जिल्ह्यात…
