-

गाझा मदत निधीच्या नावाखाली ५ कोटींचा घोटाळा; भिवंडीत तीन जण अटकेत
•
लखनऊ/ठाणे : उत्तर प्रदेश एटीएसने (Anti-Terrorism Squad) एक मोठा फसवणुकीचा कारनामा उघडकीस आणला आहे. ‘गाझा पीडितांना मदत’ या नावाखाली तब्बल ५ कोटी रुपयांचा निधी गोळा करून तो वैयक्तिक वापरासाठी आणि संशयास्पद कामांसाठी वळविण्यात आल्याचे समोर आले आहे. ही कारवाई ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे करण्यात आली. शनिवारी उशिरा रात्री एटीएसने भिवंडीमध्ये…
-

पालघरमध्ये १२ कोटींचे लाल चंदन जप्त; तस्करीचा मोठा प्रयत्न उधळला
•
पालघर : पालघर जिल्ह्यातील वनविभागाने एका मोठ्या कारवाईत तब्बल १२ कोटी रुपयांचे लाल चंदन जप्त केले आहे. १८ सप्टेंबर रोजी रात्री दहिसर जंगल परिसरातील साखरे गावात असलेल्या एका सोडून दिलेल्या फार्महाऊसवर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. या छाप्यात सुमारे २०० गाठी लाल चंदनाच्या जप्त करण्यात आल्या. प्राथमिक चौकशीत समोर…
-

शिवाजी पार्क जिमखाना पुन्हा सुरु; तेंडुलकरांनी केले उद्घाटन; राज ठाकरेही उपस्थित
•
मुंबईतील क्रिकेट आणि मराठी संस्कृतीचे प्रतीक मानला जाणारा शिवाजी पार्क जिमखाना (SPG) नूतनीकरणानंतर सोमवारी पुन्हा सुरु झाला. या ऐतिहासिक क्षणाला क्रिकेटर भारतरत्न सचिन तेंडुलकर उपस्थित होते. त्यांनी रिबन कापून जिमखान्याचे उद्घाटन केले आणि उपस्थित प्रेक्षकांच्या गगनभेदी टाळ्यांचा वर्षाव झाला. सचिन तेंडुलकरांसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब…
-

पुणे पोलिसांची गुन्हेगारांवर धडक कारवाई; ४३ कुख्यात गुन्हेगार ताब्यात
•
पुणे : येत्या उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पुणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीविरोधात मोहीम उघडली आहे. या कारवाईत तब्बल ४३ कुख्यात गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती पुणे पोलिसांचे उपआयुक्त (झोन 1) ऋषिकेश रावळे यांनी दिली. गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात गुन्हेगारीत वाढ होत असल्याचे निदर्शनास आले…
-

एच-१बी व्हिसा महाग; आयआयटी विद्यार्थ्यांसाठी नवे करिअर मार्ग खुले
•
मुंबई : अमेरिकेतील महागड्या H-1B व्हिसामुळे भारतीय तंत्रज्ञान संस्थांचे (IIT) विद्यार्थी फारसे चिंतीत नाहीत. कारण IIT कॅम्पसवर येणाऱ्या फक्त ५ ते ७ टक्के भरती कंपन्या परदेशी आहेत, तर बाकी बहुतेक जागतिक दिग्गज कंपन्यांची कार्यालये आता बेंगळुरू, हैदराबाद किंवा गुढगावमध्येच असल्याने विद्यार्थ्यांना परदेशात जाण्याची सक्ती राहिलेली नाही. गेल्या तीन वर्षांत मोठ्या…
-

एआयमुळे महिलांच्या नोकऱ्यांवर मोठा धोका : संयुक्त राष्ट्राचा अहवाल
•
नवी दिल्ली : जगभर झपाट्याने वाढणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्रांतीचा महिलांच्या रोजगारावर पुरुषांच्या तुलनेत अधिक विपरित परिणाम होऊ शकतो, असा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या “जेंडर स्नॅपशॉट २०२५” या अहवालात देण्यात आला आहे. या अहवालानुसार, जगातील सुमारे २८ टक्के महिलांच्या नोकऱ्या AI मुळे धोक्यात आहेत, तर पुरुषांच्या फक्त २१ टक्के नोकऱ्यांना हा…
-

उदे गं अंबे, उदे !!
•
नवरसाने नटलेल्या नित्यनूतन नवलाईचा, नवसृजनाचा, नवरात्रींचा उत्सव सुरू झाला आहे. आता हवेमध्ये धुपाचा गंध भिनत जाईल. घटस्थापनेनंतर हिरवा निसर्ग, लाल, केशरी, पिवळा होत, अवघ्या भूतलावर, फुलांच्या माळा गुंफत येईल आणि स्त्रीत्वाच्या परमोच्च आविष्काराचे, मातृत्वाच्या गौरवाचे शब्द-गीत चराचरात भिनत जातील… भक्ती आणि शक्तीच्या अविरत प्रवाहात अवघे भारतवर्ष न्हाऊन निघेल… आपले सारे…
-

माथेरानमध्ये घोड्यांना आंधत्वाचा धोका; गूढ आजारामुळे पर्यावरण आणि पर्यटनावर संकट
•
माथेरान : माथेरानमधील घोड्यांमध्ये अलीकडेच गूढ आजारामुळे आंधत्वाची प्रकरणे समोर आली असून स्थानिक घोडेपालक, पशुवैद्यक आणि पर्यटन व्यवसायिक यांच्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या दहा पेक्षा जास्त घोडे या आजाराने बाधित झाल्याची नोंद झाली आहे. घोड्यांमध्ये सुरुवातीला डोळ्यांत पाणी येणे, सूज येणे, रंग बदलणे अशी सौम्य लक्षणे दिसतात. परंतु…
-

अजित पवारांची मंत्र्यांना तंबी : “वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा”
•
नागपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्र्यांना स्पष्ट शब्दांत तंबी दिली आहे. “पालकमंत्री झालात म्हणजे त्या जिल्ह्यात हजेरी लावायलाच हवी. अधिकारी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत फिरा. जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय साधा. अन्यथा खुर्ची सोडा,” असा कठोर इशारा त्यांनी चिंतन शिबिरात दिला. नागपूरात शुक्रवारी पवार गटाचे चिंतन शिबिर पार पडले. सकाळी ९:३० वाजता सुरू…
-

नाशिक कुंभमेळा 2027 साठी राज्य सरकारची मंत्रिमंडळ समिती स्थापन
•
2027-28 मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ महाकुंभमेळासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने सात मंत्र्यांची विशेष समिती स्थापन केली असून भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांची कुंभमेळा मंत्री तसेच समिती प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही शिखर समिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे.…
