-

स्व. अनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्काराने संपादक मनोज भोयर यांचा होणार सन्मान
•
नागपूर : विदर्भातील पत्रकारिता क्षेत्राला प्रेरणा देणारे ज्येष्ठ कवी, विचारवंत आणि पत्रकार स्व. अनिलकुमार यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी दिला जाणारा “स्व. अनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्कार” यंदासाठी जाहीर करण्यात आला आहे. नवराष्ट्र डिजिटलचे राजकीय संपादक मनोज भोयर यांचा पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे. त्यांच्यासह दैनिक हितवादाचे सहसंपादक राहुल दीक्षित, ज्येष्ठ छायाचित्रकार…
-

तेजस्वी यादव यांच्या ‘बिहार अधिकार’ यात्रेला १६ सप्टेंबरपासून सुरुवात
•
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची तारीख जवळ येत असताना विरोधी महाआघाडीने प्रचाराला गती दिली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींच्या १४ दिवसांच्या ‘मतदार अधिकार यात्रा’नंतर आता आरजेडीचे नेते व विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव १६ सप्टेंबरपासून ‘बिहार अधिकार यात्रा’स सुरुवात करणार आहेत. ही पाच दिवसांची यात्रा १६ ते २० सप्टेंबरदरम्यान पार पडणार असून तिचा…
-

देशातील २१% खासदार-आमदार राजकीय घराण्यातून : महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर
•
नवी दिल्ली : असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) च्या अहवालानुसार देशातील लोकप्रतिनिधींमध्ये घराणेशाहीचा प्रभाव प्रचंड आहे. देशातील २१% खासदार, आमदार आणि विधानपरिषदेचे सदस्य हे राजकीय कुटुंबातून आलेले आहेत. यात उत्तर प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. अहवालानुसार, उत्तर प्रदेशातील ६०४ लोकप्रतिनिधींमध्ये १४१ (२३%) जण राजकीय घराण्यातील आहेत. महाराष्ट्रात ४०३…
-

कुर्डू मुरुम उत्खनन वाद गाजला, पालकमंत्री गोरे म्हणाले, उत्खनन बेकायदेशीर
•
कुर्डूवाडी (सोलापूर) : कुर्डू गावातील मुरुम उत्खननप्रकरण अधिकच चिघळले असून शुक्रवारी संपूर्ण गावाने शंभर टक्के बंद पाळला. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माजी सरपंच अप्पारावसाहेब ढाणे यांनी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यावर गंभीर आरोप केल्याने वातावरण तापले आहे.दरम्यान, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मिळालेल्या अहवालानुसार कुर्डूतील मुरुम उत्खनन हे बेकायदेशीर असल्याचे सांगितले आहे. गेल्या…
-

फटाक्यांवरील निर्बंध केवळ दिल्लीपुरतेच का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
•
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवरील निर्बंध केवळ दिल्ली-एनसीआरपुरते मर्यादित ठेवण्याऐवजी संपूर्ण देशभर लागू करण्याची आवश्यकता अधोरेखित केली आहे. शुद्ध हवा मिळणे हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा मूलभूत अधिकार असल्याचे स्पष्ट करत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सरकारसमोर गंभीर प्रश्न उपस्थित केला. त्यांनी म्हटले की, जर दिल्लीतील नागरिकांना शुद्ध हवा मिळण्याचा हक्क…
-

“भारत मोठा होत चालल्याने टॅरिफ लावले गेले” : मोहन भागवत
•
नागपूर : “भारत मोठा होत चालल्याने काही देश अस्वस्थ झाले आहेत. त्यांच्या मनात निर्माण झालेल्या भीतीमुळेच भारतावर टॅरिफ लावले गेले,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. हिंगणघाटच्या जाम येथील विश्वशांती सरस्वतीच्या वार्षिक उत्सवदर्शनात ते बोलत होते. भागवत म्हणाले की, “भारताची प्रगती जगाला दिसते आहे. सातासमुद्रापलीकडील…
-

दिल्ली नंतर मुंबई उच्च न्यायालयाला बॉम्बस्फोटाची धमकी, परिसर रिकामा
•
मुंबई : दिल्ली उच्च न्यायालयानंतर आता मुंबई उच्च न्यायालयालाही शुक्रवारी दुपारी बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली. न्यायालयाच्या अधिकृत ईमेलवर ही धमकी आली असून तात्काळ सर्व न्यायमूर्ती, वकील, कर्मचारी आणि नागरिकांना इमारतीबाहेर काढण्यात आले. यामुळे सुरू असलेली सर्व सुनावणी थांबवण्यात आली असून न्यायालयीन कामकाज ठप्प झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…
-

जीआरवरून वादंग : सरकारचा दावा, ओबीसींवर अन्याय नाही
•
मुंबई : हैदराबाद गॅझेटनंतर राज्य सरकारने काढलेल्या नव्या शासन निर्णयावरून ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा चिघळला आहे. मात्र हा जीआर कोणालाही सरसकट आरक्षण देत नसून, अन्याय टाळण्यासाठी घेतलेला निर्णय आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. “या सरकारच्या काळात ओबीसींवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही,” असा ठाम विश्वास…
-

समृद्धी महामार्गाच्या कामात निष्काळजीपणा; कंत्राटदारावर गुन्हा दाखल
•
दौलताबादजवळील समृद्धी महामार्गाच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामात झालेल्या निष्काळजीपणामुळे अनेक वाहनांचे टायर पंचर झाले. या प्रकरणी कंत्राटदाराविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना अशी की, माळीवाडा गावाजवळील पुलावर पडलेल्या भेगा बुजविण्यासाठी इंजेक्शनने नोजल बसविण्याचे काम मंगळवारी मध्यरात्री सुरू होते. कामादरम्यान वाहतुकीसाठी योग्य अशी सुरक्षा व्यवस्था न करता काम सुरू ठेवण्यात आले.…
-

ईव्हीएम तुटवड्यामुळे छत्रपती संभाजीनगरात कमी होणार मतदान केंद्रे
•
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात दिवाळीनंतर नगरपालिकांसह जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. मात्र या निवडणुकांमध्ये ईव्हीएम तुटवड्याचे संकट निर्माण होणार असल्याने जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रे कमी केली जाण्याची शक्यता आहे. यंदा १०० हून अधिक केंद्रे कमी होतील, असा अंदाज आहे. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये जिल्ह्यात…
