Category: News and Updates
-

महाराष्ट्र प्रशिक्षणात पुढे; नोकरीत मागे प्रशिक्षण १३ लाख जणांना, नोकरी ८० हजार जणांनाच
•
नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री कौशल विकास योजना’ (पीएमकेव्हीवाय) अंतर्गत देशभरात प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांना रोजगार मिळण्याचे प्रमाण खूपच कमी असल्याचे एका आकडेवारीतून समोर आले आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती देखील याला अपवाद नाही. कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर असूनही, रोजगार देण्यात मात्र ११ व्या स्थानावर आहे. काय आहे…
-

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: ऑटोमॅटिक दरवाजे असलेल्या लोकल लवकरच सेवेत
•
मुंबईः मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच मुंबईच्या लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवले जाणार आहेत, ज्यामुळे प्रवासादरम्यान गर्दीमुळे होणारे अपघात टाळता येतील. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अध्यक्ष सतीश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या दोन लोकलमध्ये हे दरवाजे बसवण्याचे काम वेगाने सुरू आहे. हे काम यशस्वी झाल्यावर एकूण १३८ एसी…
-

विदर्भ आणि मराठवाड्यातील मालासाठी समुद्रमार्गाची सोय: महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती
•
मुंबई: विदर्भ आणि मराठवाड्यातील औद्योगिक व कृषी मालाची वाहतूक अधिक सुलभ करण्यासाठी आणि मुंबईतील रस्त्यांवरील गर्दी टाळण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. वाढवण बंदर आणि समृद्धी महामार्ग यांना जोडणारा एक नवा फ्रेट कॉरिडोर (मालवाहतूक मार्ग) तयार करण्यात येणार आहे. हा १०४ किलोमीटर लांबीचा महामार्ग भारत (ता. इगतपुरी, जि.…
-

मुंबई-उरण मार्गावरील ई-बोटसेवा १५ ऑगस्टपासून सुरू होणार?
•
उरण येथील जेएनपीए-मुंबई सागरी मार्गावर अत्याधुनिक ई-स्पीड बोटसेवा १५ ऑगस्ट किंवा १ सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती माझगाव डॉक बिल्डर्स लिमिटेड कंपनीने दिली आहे. ही सेवा सुरू होण्यास मागील सहा महिन्यांपासून विलंब होत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. प्रवासी संख्या घटल्याने खर्चाचा प्रश्न उरण रेल्वे मार्गावर पावसाळ्यात प्रवासी वाहतूक…
-

‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
•
मुंबई : नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) ‘माधुरी’ हत्तीणीला पुन्हा मठात आणण्यासाठी राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाणार आहे. ही जनभावना लक्षात घेऊन नांदणी मठाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी. राज्य शासनानेही स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयात हत्तीणीला परत देण्यासंदर्भात भूमिका माडेल, असे सांगून याप्रकरणी राज्य शासन…
-

सोलापूर जिल्ह्यामध्ये लम्पी साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव, ३३ जनावरे दगावली
•
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांमध्ये ‘लम्पी’ या साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या आजारामुळे आत्तापर्यंत ३३ जनावरांचा मृत्यू झाला असून, ४०३ जनावरे या आजाराने ग्रस्त आहेत. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, लम्पी हा त्वचेशी संबंधित आजार असून, त्याचा सर्वाधिक फैलाव माळशिरस तालुक्यात झाला आहे. माळशिरस तालुक्यामध्ये एकूण ६८५ जनावरांना…
-

वर्षानुवर्षे प्रकल्प लटकवू नका; तीन वर्षांत पूर्ण करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
•
मुंबई: पायाभूत सुविधांचे प्रकल्प वर्षानुवर्षे सुरू न ठेवता ते हाती घेतल्यावर तीन वर्षांत पूर्ण झाले पाहिजेत, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यांनी सोमवारी मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत मुंबईतील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला, त्यावेळी हे निर्देश दिले. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्य सचिव…
-

कबुतरांना दाणे टाकण्यावरून वाद, वृद्ध नागरिकाला मारहाण; चौघांविरोधात गुन्हा दाखल
•
मीरा रोड: कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे होणाऱ्या गंभीर आजारांमुळे मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरखान्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. असे असतानाच मीरा रोड येथे कबुतरांना दाणे टाकण्यावरून झालेल्या वादातून एका ६१ वर्षीय वृद्ध नागरिकाला मारहाण करण्यात आली. त्यांच्या मुलीचा गळा दाबून तिला लोखंडी रॉडने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.…
-

मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांना २ कोटींचा भुर्दंड; पालिका अॅक्शन मोडवर
•
मुंबई: राज्य सरकारने दुकानांवरील पाट्या मराठीत असणे सक्तीचे केले असतानाही, अनेक दुकानदार या नियमाचे पालन करत नाहीत. यामुळे मुंबई महानगरपालिकेने अशा दुकानदारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. आतापर्यंत ३,१३३ दुकानांवर कारवाई करण्यात आली असून, त्यातून तब्बल १ कोटी २९ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वारंवार सूचना देऊनही मराठी पाट्या न…
-

पत्नीला भारतात ठेवण्याच्या अटीविरोधात पतीची सर्वोच्च न्यायालयात याचिका
•
नवी दिल्ली: लग्नाचं आमिष दाखवून एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने राजस्थान उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिलं आहे. नोकरीसाठी परदेशात जायचं असल्यास, पत्नीला भारतातच ठेवण्याच्या राजस्थान उच्च न्यायालयाच्या अटीला त्याने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. या प्रकरणाची सुनावणी ८ ऑगस्ट रोजी होणार आहे. काय आहे प्रकरण? सॉफ्टवेअर…
