Category: News and Updates
-

तुरुंगातील ७० टक्के कैदी अद्याप निर्दोष ठरलेले नाहीत; फेअर ट्रायल प्रोग्रामने उघड केली धक्कादायक वास्तवता
•
नवी दिल्ली : देशातील तुरुंग व्यवस्थेतील भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. देशातील तब्बल ७० टक्क्यांपेक्षा जास्त कैदी अद्याप दोषी ठरवण्यात आलेले नाहीत, तरीही वर्षानुवर्षे तुरुंगात आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी नालसार विद्यापीठाच्या स्क्वेअर सर्कल क्लिनिकचा अहवाल प्रसिद्ध करताना ही माहिती दिली. या अहवालानुसार, ७४ टक्के कैदी…
-

मुंबईचा श्वास अजूनही कोंडलेलाच; ५७४ कोटी खर्चूनही प्रदूषण नियंत्रणात अपयश
•
मुंबई : राज्य सरकारने आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी हवा प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला असला तरी परिणाम मात्र शून्य असल्याचे चित्र समोर आले आहे. मुंबई महानगरपालिकेने ९३८.५९ कोटींपैकी तब्बल ५७४.६४ कोटी रुपये खर्च केले, तरीही शहरातील हवेची गुणवत्ता सुधारलेली नाही. वातावरण फाउंडेशन आणि एन्वारोकॅटलिस्ट यांनी संयुक्तपणे सादर…
-

शरद पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची अचानक भेट; पार्थ पवार जमीन प्रकरणावर चर्चा?
•
पुण्यातील कथित बहुशे कोटींच्या जमीन गैरव्यवहाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी सकाळी अचानक भेट झाली. ही भेट सुमारे 15 मिनिटे चालली असून, त्यानंतर पवार हे मंत्रालयाजवळील वाय. बी. चव्हाण केंद्रात आपल्या कार्यालयात रवाना झाले. सदर भेटीत मुंबई क्रिकेट असोसिएशन…
-

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘इनोव्हेशन महाकुंभ 2025’ चे उद्घाटन; महाराष्ट्र ‘स्टार्टअप राजधानी
•
एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या जुहू कॅम्पसवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘इनोव्हेशन महाकुंभ 2025’ या स्टार्टअप कार्यक्रमाचे रविवारी भव्य उद्घाटन करण्यात आले. या वेळी विद्यापीठाच्या प्री-इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटन करण्यात आले, तसेच वैद्यकीय, कृषी आणि वाहतूक व्यवस्थापन क्षेत्रातील तीन नवकल्पनांना गौरविण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक…
-

‘भारतीय काव्यशास्त्रातील गोपन आणि शोधन’ विषयावर विंदा करंदीकर स्मृती व्याख्यान
•
मुंबई — प्रख्यात कवी विंदा करंदीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित विंदा करंदीकर स्मृती व्याख्यान या विशेष कार्यक्रमाचे आयोजन यंदा “भारतीय काव्यशास्त्रातील गोपन आणि शोधन” या विषयावर करण्यात आले आहे. हा कार्यक्रम हजारिमल सोमनाणी वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय आणि श्रीमती कुसुमताई चौधरी कला महाविद्यालय (स्वायत्त), बांद्रे (पूर्व), मुंबई यांच्या वतीने, विंदा करंदीकर…
-

इच्छामरणाचे प्रणेते प्रा. सदानंद वर्दे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
•
मुंबई | ज्येष्ठ समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत आणि माजी शिक्षणमंत्री प्रा. सदानंद वर्दे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वर्दे मित्रमंडळ आणि परिवाराच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवार, ६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता, वांद्रे (पश्चिम) येथील नॅशनल कॉलेजच्या सभागृहात पार पडणार आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक व…
-

महाराष्ट्रावर पुन्हा मोठं संकट! हवामान विभागाचा इशारा; 10 जिल्ह्यांना ‘हाय अलर्ट’
•
राज्यात नुकत्याच ओसरलेल्या पावसानंतर नागरिकांना दिलासा मिळणार असं वाटत असतानाच पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासाठी मोठा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वाढली आहे. पुढील तीन ते चार दिवस महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांना ‘हाय अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे. पुन्हा पावसाची…
-

उद्धव ठाकरेंचं शेतकऱ्यांना आवाहन: “कर्जमुक्ती मिळेपर्यंत सरकारला मत नाही”; भाजपचा पलटवार
•
धाराशिव : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होत असतानाच उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौऱ्यातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला घेरलं आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी दरम्यान ठाकरे म्हणाले, “जूनची कर्जमाफी आम्हाला मान्य नाही. जोपर्यंत कर्जमुक्ती नाही, तोपर्यंत सरकारला मत देऊ नका. प्रत्येक गावात असा बोर्ड लावा,” असं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलं. ठाकरे…
-

संजय राऊत यांची तब्ब्येत बिघडली; उपचारासाठी रूग्णालयात दाखल
•
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांची तब्ब्येत बिघडल्याची माहिती समोर आली आहे. प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना भांडूप येथील फोर्टिस रूग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या ते वैद्यकीय देखरेखीखाली आहेत. राऊत यांच्या आरोग्याची तपासणी डॉक्टरांच्या पथकाकडून सुरू आहे आणि पुढील उपचार त्याच ठिकाणी केले जाणार आहेत. काही दिवसांपूर्वीच…
-

भाजीविक्रेत्याचं नशीब फळलं! उधारीवर घेतलेलं लॉटरी तिकीट ठरलं ‘जॅकपॉट’, तब्बल ११ कोटींचा बंपर लाभ
•
ते म्हणतात ना – नशिब कधी, कुठे आणि कसं पलटी मारेल, सांगता येत नाही! राजस्थानातील एका साध्या भाजीविक्रेत्याच्या आयुष्यात अगदी असाच चमत्कार घडला आहे. राजस्थानच्या जयपूर जिल्ह्यातील कोटपुतली येथील भाजीविक्रेता अमित सेहरा यांनी पंजाब राज्य लॉटरी – दिवाळी बंपर २०२५ मध्ये तब्बल ११ कोटी रुपयांचे बक्षीस जिंकले आहे. विशेष म्हणजे,…
